Skip to main content

Posts

Showing posts from 2014

निषेध!!!

 गेल्या निवडणुकांमध्ये भारतीयांनी मोदीला मत दिल्यामुळे आज त्यांची मनमानी आपल्याला दिसत आहे. भारतीय संविधानानुसार स्थापन केलेलं "नियोजन आयोग" (planning commission) मोदींनी त्याला सरळ बरखास्त केलं. जगातल्या इतर देशांमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान गेल्यावर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना "गीता" वाटत फिरतात. जगभरातून होणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्या टी.व्ही.वर येत नाही, तर उलट "संघाचे" भाषणं प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. ते अमेरिकेत भाषण करताना भारत देशाला उन्नत करणाऱ्या महामानवांना मोदी विसरतात. मोदींनी आजपर्यंत फक्त गुजरातच्या खोट्या प्रगतीच्या गप्पा केल्या, पण त्यांचंच सरकार असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश यांच्यासारख्या इतर राज्यांचे काय झाले हे ते सांगत नाहीयेत. मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी रिझव्‍‌र्ह बँक दिल्लीला हलवत आहेत, त्याची तयारी म्हणजे रिझव्‍‌र्ह बँके तीन कार्यालये मोदींनी आधीच दिल्लीला हलवले आहेत. त्या आधी पालघर येथे प्रस्तावित असलेले महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कार्यालयही मोदी यांनी गुजरातमध्ये हलवले आहे. मुंबईवर झालेल

वैताग

एक पोट, पन्नास रुपये, उपाशी चालतो, कसाईवाडा... दोन पोट, शंभर रुपये, मेंदू सुन्न, थैली आणतो... तीन पोट, शंभर रुपये, मनात राग, वाटून खातो... चार भिंती, चार दगडं, दगडांचे पोट, पुन्हा पन्नास रुपये... - आशित रजनी.

मुक्त साहित्य

(आत्तापर्यंतच्या एकूण वाचनातून आणि अनुभवांमधून मला काय जाणवलं ते या कवितेत आहे.) तुमच्यासारखं आमच्या कवितेत नसतात यमक, पण असतात गमक समाजाचे. तुमच्या संस्कृतला आम्ही हुंगत पण नाही, आमच्या साहित्याला निर्माण करायला. ते वाटू द्या तुम्हाला प्राकृत, आम्ही आहोतच अस्पृश्य मेनस्ट्रीमपासून दलित म्हणून. निसर्गाने दिलेल्या जगण्याला, आणि जगण्यातल्या स्वातंत्र्याला आम्ही जागवतोय, आंबेडकरी म्हणून. आमचं जगणंच असतं आमचं साहित्य, आमच्या वेदनाच असतात आमचे शब्द. तुमचे गोड गुलाबी रोमँटिक काव्य माणूसपणाच्या काही कामाचे नाही. त्यातून वासच येत असतो वासनेचा, प्रेमाच्या पलीकडे न जाणाऱ्या सडक्या मेंदूचा. आमच्या जहाल विद्रोही साहित्यातून व्यक्त होत असते चीड अन्यायाची, सोबत असते बुद्धाची करुणा माणसाला मुक्त करण्यासाठी. - आशित रजनी.

पेच

जगण्यासाठी गुदमरून पेचात अडकलेल्या जिवाभोवती आकांततांडव होतोय; विलासासाठी, स्वार्थासाठी. हृदयातल्या, छातीतल्या मानसिक कळा, थरथरते हात, आवळत जाणाऱ्या मुठ्या आणि लाल डोळे, घेऊन जात आहेत मला भविष्यात पुढच्या क्षणातल्या. वर्तमानात येताच वर्तमान दाखवतोय माझं वर्तमान काळ, आणि तांडव थांबवण्यासाठी उभा राहतोय मी एकटाच. न्यायव्यवस्थेच्या डोळ्यावरची पट्टी काढून अन्यायाच्या गळ्याभोवती गुंडाळावीशी वाटतेय फासासारखी, न्यायासाठी, संघर्षासाठी, विद्रोहासाठी... - आशित रजनी.

Impact of political advertising

 India has became too much aggressive in advertising & marketing. In 2014, Indian politics has adopted the funda of advertising looking at Indian psychology & changing trends and issues. According, to the elections till now, we can see the impact of advertising on Indian people. Many of them (voters) are from different background other than politics. These common people "get affected" to this aggressive marketing of a brand (candidate) through advertises.  This marketing contains not only advertises but also various types of campaigns targeting youth & colleges. This technique took the BJP to a higher success and fame. Also, social media helped it to reach more & more people. So, as a result, we can see, that people who do not belong to any political background or have no knowledge of politics or Indian history, they started supporting NaMo and all other candidates got erased from the minds of common people because of their slogan "Abki baar Modi Sarkar&

विक्षिप्त अनुभव

(मी जात आणि धर्म या दोन्ही गोष्टी सोडून दिलेला व्यक्ती आहे, हे लक्षात घेऊन पुढील अनुभव वाचा.)  दोन दिवसापूर्वी सकाळी माझ्या एका मित्राचा फोन आला. करिअरसाठी तो अनेकांना भेटतो, धडपड्या देतो. याच संदर्भात त्या मित्राला एक माणूस भेटला होता. त्याने मला आणि अजून एका मित्राला कॉल केला आणि म्हटला की "आपल्या करिअरची सुरुवात झालीच समज. ते सर खूप पैशावले आहेत आणि त्यांच्या खूप ओळखी आहेत. फक्त ठाण्याला येऊन त्या सरांची भेट घे." मी असं कोणाला भेटत नाही, पण त्या मित्राने खूप आग्रह करून मला बोलावून घेतलं.  मी ठाण्याला गेलो, पुढे अर्ध्या तासाच्य प्रवासानंतर पत्ता शोधून त्या सरांकडे पोहोचलो. दुसरा मित्र आधीच तिथे पोहोचला होता. त्या सरांचा फोटोग्राफीचा क्लास होता तो त्यांनी सांगितला, त्याची फीस कमीच होती पण माझ्यासाठी जरा जास्तच होती. पण तो माणूस ज्या गोष्टीसाठी आम्ही त्याला भेटायला गेलो ते क्षेत्र सोडून सतत वेगळ्या विषयात घुसत होता. माझी इच्छा होती की त्याने चित्रपट आणि त्याच्या टेक्निकल बाबींवर आमच्याशी चर्चा करावी; तशी मानसिकता बनवूनच मी गेलो होतो. पण तो माणूस सतत जात, धर्म , समाज आणि राजक
रोज व्होट्सअॅप वर अॅट्रॉसिटीच्या बातम्या येतायत, वर्तमानपत्र चाळल्यावर ते कोरे वाटतायत, आणि टी.व्ही वर मोदीच दिसतायत... टेक्नोलॉजीच्या नादात आपण समाज विसरलोय, चंगळवादाच्या जगात चॅटिंग करूनच थकलोय, gn.sd.tc करत आपण आपल्या जिवंतपणालाही मुकलोय... वेदना आणि संवेदना यांच्यातलं अंतर वाढत चाललंय, सनातन्यांच्या डोक्यात भेदभावाचं भूत दडलंय, आणि माणसाच्या जातीनेच त्याला मरेपर्यंत खाल्लंय... - आशित साबळे
    दलितांवर होणारे अत्त्याचार दिवसेंदिवस आणि तासंतास वाढतच जात आहेत. हे दलित केवळ धर्मांतर केलेले बौद्ध नसून हिंदू धर्मात आजही टिकून(?) असलेले खालच्या जातीतील लोक. दलित म्हटलं की, महार, मांग आणि काही अंशी चांभार अशा काही निवडक जाती सर्वसामान्य लोकांच्या मनात येतात. मुळात दलित म्हणजे कोणत्याही जाती, जमाती, वर्ण, वर्गातील पिढीत, शोषित, वंचित लोक. ज्यांच्यावर अत्त्याचार होत (आले) आहेत असा समाज म्हणजे दलित. पण भारतातील समाजव्यवस्थेने इथल्या सध्याच्या मानसिकतेनुसार दलितांनाच दलित बनवून ठेवलं आहे, त्यामुळे जे जाती निर्मुलनासाठी काम करतात त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन त्या "आंबेडकरी" सामाजाव्यातिरिक्त कोणताच समाज लोकांना दलित म्हणून दिसत नाही.     अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच घडत असलेले प्रकार पाहून आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्या भागाला "कास्ट प्रोन" म्हणजेच जातीव्यवस्थेच्या भेदभावाने ग्रस्त घोषित करा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाच आठवड्यात जातीभेदाचे चार प्रकार समोर आले आहेत. नितीन आगे या तरुणाची अमानुष हत्या, एका दलित स्त्रीच्या मृतदेहाचा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्य

ठाव

सॉक्रेटिस ते ॲरिस्टॉटल, चार्वाक, बुद्ध ते चक्रधर, अलेक्झांडर ते शिवाजी, मार्क्स पासून माओ, अशोक ते आंबेडकर, संतांपासून शाहीर, सर्वांनीच मला ओळखलं सर्वच माझ्याकडून शिकले... अण्णाभाऊंनी तर ही सृष्टी माझ्यामुळे तरलेली म्हटलंय... तर बागुलांनी या सृष्टीचा निर्माताच मला म्हटलंय... असंख्य कविता, ओव्या माझ्यावर रचल्या गेल्यात... अगणित कथा कादंबरी माझ्यावर लाहिल्या गेल्यात... या कशातच दैवी काहीच नाही. सर्वच मी आहे, आणि माझ्यापासूनच सर्वकाही आहे. मग अदृश्याचं अस्तित्व टिकवून, मलाच माझं अस्तित्व शोधायला लावणारी, व्यवस्था का आहे? कोणाला माहीतच नाही... - आशित साबळे

झळ

पोट न बघता खिसा बघायचा, जेवायला... पोट फाटलं तरी खिसा जपायचा, जमलेले पैसे ठेवायला... फाटकी चप्पल पायात घालून, टाच जमिनीवर घासत निघालो... जगात कोणी कुणाचं नाय, हे माझ्या मनालाच म्हणालो... तापलेल्या जगाने लावलं उन्हाकड जायला... रस्त्यावरच्या चटक्यातून शिक्षण घ्यायला... पाठीवर ओझं घेऊन चालत निघालो, मिळालेल्या घातातून शहाणा मी झालो... रात्रीच्या गारव्यात, गेलो मी झोपायला... दगडाचं काळीज माझं लागलं विचार करायला... - आशित साबळे
दि. १९ फेब्रुवारी २०१४. २ वाजता.  आज अचानक नागराज मंजुळे माझ्या कॉलेजच्या बाहेर कट्ट्यावर भेटले. लेक्चर असताना बाहेर थांबलो. अमित भंडारी आणि ते कॅमेरासमोर गप्पा मारत बसले होते. मी त्यांचं संपेपर्यंत थांबलो. अगोदर अव्य आणि सुजाता गेले, त्यांना ते पुण्यातच भेटले होते, बघितलं होतं. नागराज मंजुळेंनी त्यांना ओळखलं. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो त्यांना हात मिळवला आणि फेसबुकवर Fandry बद्दल लिहिलेलं सांगताच त्यांनी मला ओळखलं!!! स्वताहून त्यांनी माझं नाव घेतलं!!! मला फार फार आनंद झाला आणि आश्चर्यही वाटला; की फेसबुकवर अनेकांनी Fandryवर लिहिलंय आणि या क्षेत्रात अनेकांना भेटल्यावर डोक्यात जो गोंधळ होतो, तेव्हा आधी भेटलेल्या लोकांनाही लोक ओळखत नाहीत, पुन्हा डोक्यात गेलेली हवा असते. फुगिरी मारत लोक भाव खातात; पण नागराज मंजुळेसारखा आभाळा इतकं यश गाठलेला चित्रपट दिग्दर्शक इतका साधा पण इतका हुशार आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी की फेसबुकवर कोण्या एका मुलाने लिहिलेला त्याचा अनुभव नागराज मंजुळे लक्षात ठेवतात आणि कधी न भेटलेल्या त्या मुलाला ते लक्षात ठेवून ओळखतात!!! हे अनुभव तर मी आयुष्यात विसरू शकत नाही. पुन्

तू बता...

रगों में लाल लहू है, तेरे भी मेरे भी ; फिर ये जात और धरम कहाँ है... तू बता... किसने किसे बनाया मालूम नहीं, तुझे भी मुझे भी ; फिर ये उपरवाला आया कहाँ से... तू बता... सभी मजहब ने तो इंसानियत सिखाई है, तुझे भी मुझे भी ; फिर ये दंगे फसाद क्यूँ है... तू बता... प्यार तो सभी ने किया है, तूने भी मैंने भी ; फिर ये नफरत क्यों है, तू बता... अपनों के लिए दरवाजे तो खुले है, तेरे भी मेरे भी ; फिर दूसरों के लिए दीवारें क्यों है, तू बता... पेट तो सभी का भरता है, तेरा भी मेरा भी ; फिर किसान मरता क्यों है, तू बता... तुझे धर्म ने बनाया हुआ इन्सान चाहिए ; या इन्सान ने बनाया हुआ धर्म चाहिए, तू बता... - आशित साबळे

Post-Fandry experience

काय पिच्चर बनवलाय ल्येका...!!! मराठी चित्रपटसृष्टीतला एक क्रांतिकारी टप्पा म्हणजे "फँड्री" Conceptual :-  मला असं वाटतं की, फँड्री मधली प्रेमकथा ही त्या चित्रपटासाठी एक कथेचा आधार म्हणून वापरली. ती जाणीव तर होतेच की, त्या वयातले मुलं हे असं करतात आणि ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. मी तर म्हणेल ही प्रेमकथाच नव्हती, चित्रपटात दिग्दर्शकाने जब्याच्या मनातलं त्या मुलीबद्दल असणारं आकर्षण दाखवलं आहे. पण मुळात हा चित्रपट भारतातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे. जब्याच्या मनात शालूसाठी जे काही आहे, त्याच्यासोबत त्याला त्याच्या जातीमुळे वाटणारी घृणा, न्यूनगंड आणि असमानता या गोष्टी त्याला आतून अस्वस्थ करत असतात.  माणसाला त्याच्या जन्मासोबत त्याची जात फ्री मिळते, आणि त्याच जातीप्रमाणे त्या माणसाला वागावं लागतं आणि काम करावं लागतं. याच ठिकाणी सुरु होतो तो उच्च आणि "नीच" भेदभाव. कैकाडी (निम्न / अस्पृश्य) जातीतला हा मुलगा एका सवर्ण मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ह्या सर्व जातीच्या भिंती तोडून समान जगायचं असतं आणि त्याला शाळेत मित्रांसमोर आणि शालूसमोर शायनिंग मारण्य

Pre-Fandry

१४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहतोय... फक्त "फॅंड्री"साठी! एखादी जवळची व्यक्ती आपल्याला खूप दिवस भेटली नाही तर त्याची जशी आठवण येते, त्याच प्रकारे या चित्रपटाने मनाला घोर लावलाय. ही फिलिंग यासाठी येतेय की चित्रपटाचे प्रोमोज, थीम सॉंग, मुलाखतींचे विडीयो, इत्यादी पाहून मी त्या कथेशी कनेक्ट होत चाललोय, असं वाटू लागलंय. म्हणूनच की काय, मला माझी कथा बघायची घाई झाली आहे असं वाटतं. आम्हीच काही जणांनी दादर-माटुंगाला "चित्रपट - काल, आज, उद्या" असा परिसंवाद ठेवला होता, तेव्हा फॅंड्रीबद्दल पहिल्यांदाच प्रत्यक्ष "नागराज मंजुळे" यांचाकडून ऐकायला मिळालं. म्युझिक लाँचच्या दिवशी मी "तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला" हे गाणं २० ते २५ वेळा तरी ऐकलं असेल आणि आजपर्यंत सगळे गाणे बाजूला ठेऊन हेच गाणं ऐकतोय. काही दिवसांपासून आजूबाजूचं वातावरण "फॅंड्रीमय" झालं आहे. जो तो फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघायचं म्हणतोय, म्हणून मला तिकीट मिळेल की नाही याची चिंता वाटू लागलीये. पण काहीही होवो, अॅट एनी कॉस्ट मी फर्स्ट डे फर्स्ट शो फॅंड्री बघणारच. आणि तो चित्रपट पाहून

मॉडर्न Orthodox

समोर Facebook हातात WhatsApp, काळजात धर्म आणि मनात जात... मित्रांमध्ये Windows 8 च्या गप्पा, आणि घरात मात्र XPची साथ... खिशात Android असताना, तोंडातून निघते Reservationची बात... Smartphoneच्या स्क्रीनवर "बुवा बाबाचा" फोटो, विज्ञानाच्याच कुशीत होते अंधश्रद्धेची जाहिरात... Doctorच्या पण मनात भरलंय अध्यात्माचं ध्यान, Patientचा जीव वाचला नाही तर म्हणतो सारं देवाच्या हातात... इतिहासाच्या पलीकडे जाऊन चालते यांची बुद्धी, पुन्हा पुरावे शोधत शोधत घेतात Internetचं माप... Video पाहून लोकांच्या डोक्यात होते भलतीच गर्दी, हावरट लोकांमुळे लागते बिचाऱ्या YouTubeला पण धाप... चुकीच्या गोष्टींनी Memory भरायला काहीही पाठवतात, अजून वाट लावतो म्हणत देतात Googleला ही हे ताप!!! - आशित साबळे

तळपते सूर्यपुत्र

आपल्या अंत रिक्षात एका सूर्याने अनेक ग्रहांना जन्म दिला. अनेक वर्ष त्या सर्व ग्रहांचा संघर्ष सुरूच होता, आजही सुरूच आहे... आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे जगण्यासाठी. त्या सुर्यानेच त्यांना जिवंत ठेवलं होतं. त्याच्याच भोवती सगळे ग्रह फिरत होते, आणि तोच सूर्य सगळ्या ग्रहांना प्रकाशमान करत होता; त्याच्या उजेडाने आणि तळपत्या तेजाने... त्याच तप्त ग्रहांमध्ये त्यांचं स्वतःचं जग निर्माण झालं. त्याच निसर्गाने त्यांना "निळं आभाळ" दाखवलं. ज्यावेळी अतितप्त सूर्यकिरणे त्या निळ्या आभाळातून - ग्रहांवर पडतात, आणि काही वेळाने सूर्य मावळतो; तेव्हा सर्वत्र "भगवं वातावरण" पसरतं... जे पुढे जगाला अंधाराकडे घेऊन जातं... आणि त्याच अंधारात ... पँथर जन्म घेतो त्या अंधाकाराला दूर करायला आणि पुन्हा या जगाला निळ्या आभाळाखाली प्रकाशमान करायला... - आशित साबळे.

आजचा दिवसभराचा अनुभव

 आज खूप आनंद होत आहे की मी अशा ठिकाणी जाऊन आलो जिथे महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा इतिहास घडला आहे; ते म्हणजे "भीमा-कोरेगाव". माटुंगा रोडवरून निघालो, दादरवरून CST ट्रेन पकडायची होती. पहाटे CST लोकल ७ मिनिटं उशिरा आली. CST वरून "इंद्रायणी एक्स्प्रेस" पकडायची होती. एका ट्रेनमुळे संपूर्ण प्लान बिघडला. जाम वैतागलो त्या लोकलच्या टाईमिंगवर. शेवटी ठरवलं की, तीच पुण्याची ट्रेन आता दादरवरूनच पकडणार, तेही विदाऊट तिकीट. सगळे मित्रमंडळी खूप अगोदर CSTला जाऊन बसल्यामुळे माझी सीट राखून ठेवली होती. मजा मस्ती करत पुण्याला पोहोचलो. दोन दिवस अगोदर पुणे स्टेशन बाहेर काहीच नसताना आदल्या दिवशी तिथे काम सुरु केल्याने बाहेर जाण्यासाठी फक्त एक गल्ली उपलब्ध ठेवली होती. प्रचंड गर्दी तिथेच खूप वेळ पॅक झाली, हळू हळू आम्ही बाहेर पडलो.  बस स्थानकावरून भीमा कोरेगावासाठी स्पेशल बसेस सोडण्यात येत होत्या. आम्ही बसमध्ये चढलो आणि पटापट जागा धरली. जिथे मी बसलो होतो, तिथेच बाजूला एक चाळीशीतला माणूस आला. कदाचित दारू पिऊन आला असावा, खूप बडबड करत होता. आधीच तिथे सुरतहून एक "मोरे" नावाचे जयभीमवाले

"१" इतिहास मुक्तीचा

१ जानेवारी १८१८ चा इतिहास कोणाला माहित आहे का? मला माहित आहे, विटाळ होत असेल या सत्याचा. अस्पृश्यांचा इतिहास आहे हा; जे लढले जुलमी पेशवाईच्या विरोधात. युद्ध नावाला होतं इंग्रज आणि मराठ्यांचं, खरं ते होतं हक्क, अस्मिता आणि जातिभेदाच्या उच्चाटनासाठी. अस्पृश्य आणि पेशव्यांचं युद्ध... कोणी शिकवलंच नाही शाळेत हे सर्व. शाळेत होता इतिहास हरलेल्या लोकांचा कारण की ते स्पृश्य होते. मग ते हरलेले का असेनात, पानिपतात किंवा महाराष्ट्रात... त्या दिवशी युद्ध सुरु होण्याआधी शिरूरहून भीमा कोरेगावात महार बटालियन ४३ किलोमीटर उपाशी पोटी मार्च करत आले. सकाळीच पेशव्याचे सैनिक हजर झाले; वीस हजार घोड्यावर स्वार, आठ हजार पायी तयार. असं सैन्य त्या पेशव्यांचं, जवळजवळ ३० हजार सैनिकांचं... त्यातले दोन हजार आधीच पळून गेले होते. महार बटालियन पाचशेच होते. बारा तास युद्ध चाललं, पाचशेच्या सैन्याने २८ हजारांना कापलं. जुलमी पेशवाईला तोडलं, आणि मनुवादी शक्तीला संपवलं. हा इतिहास शाळेच्या पुस्तकात एखाद्या पानावर छापला तर मुलांना लक्षात तरी येईल की पेशवाई तर संपली, पण ती कशी... हे सांगताना त्यांना "त्या" सैन्यांचं