दलितांवर होणारे अत्त्याचार दिवसेंदिवस आणि तासंतास वाढतच जात आहेत. हे दलित केवळ धर्मांतर केलेले बौद्ध नसून हिंदू धर्मात आजही टिकून(?) असलेले खालच्या जातीतील लोक. दलित म्हटलं की, महार, मांग आणि काही अंशी चांभार अशा काही निवडक जाती सर्वसामान्य लोकांच्या मनात येतात. मुळात दलित म्हणजे कोणत्याही जाती, जमाती, वर्ण, वर्गातील पिढीत, शोषित, वंचित लोक. ज्यांच्यावर अत्त्याचार होत (आले) आहेत असा समाज म्हणजे दलित. पण भारतातील समाजव्यवस्थेने इथल्या सध्याच्या मानसिकतेनुसार दलितांनाच दलित बनवून ठेवलं आहे, त्यामुळे जे जाती निर्मुलनासाठी काम करतात त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन त्या "आंबेडकरी" सामाजाव्यातिरिक्त कोणताच समाज लोकांना दलित म्हणून दिसत नाही.
अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच घडत असलेले प्रकार पाहून आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्या भागाला "कास्ट प्रोन" म्हणजेच जातीव्यवस्थेच्या भेदभावाने ग्रस्त घोषित करा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाच आठवड्यात जातीभेदाचे चार प्रकार समोर आले आहेत. नितीन आगे या तरुणाची अमानुष हत्या, एका दलित स्त्रीच्या मृतदेहाचा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास सवर्णांचा विरोध, एका बौध्द कुटुंबाच्या घराची नासधूस करून त्यांचं घरातील समान आणि तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या घराबाहेर फेकून त्यांना बेघर करणे, गावाच्या जत्रेत शिवाजी महाराजांच्या गाण्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीत लावल्यामुळे सवर्णांनी जत्रेतील दलितांवर केलेली दगडफेक. गेल्याच महिन्यात आंबेडकर जयंतीमध्ये जातीयवाद्यांनी जयंती साजरी करणाऱ्या लोकांवर केलेली दगडफेक; साताऱ्यात एका मातंग जातीच्या स्त्रीची गावातून नग्न धिंड काढणे. काही वर्षांपूर्वी झालेली खैरलांजी. त्याही आधीची नामांतर चळवळ, रमाबाई नगर हत्याकांड, आणि संपूर्ण भारतातील अशा कित्येक घटना लक्षात घेतल्या तर आपल्याला हे कळेल की एकूण भारतीय समाजात जातीमुळे आलेला फुकटचा गर्व आणि त्यातून घडलेले समाजातील दुर्बल घटकांवारचे वाईट परिणाम हे मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या घटनांचे फार मोठे आणि भयानक चित्र उभे करणारे उदाहरण आहेत; आणि या सर्व प्रकरणात पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा हा निषेधार्य आहे. समाजाची एकूण परिस्थिती ही दलितांच्या विरोधात दिसते. जिथे कुठे अॅट्रॉसिटीचे प्रकार घडतात, तिथे नेहमी रिपाई किंवा आंबेडकरी विचारांच्या लोकांनीच जाऊन भेट का द्यावी? इतर पक्ष/संघटना या भेट देण्याचे तर सोडा, पण त्यांना न्याय मिळवून देण्यातसुद्धा त्या संघटनांचा सहभाग नसतो; फक्त मत मिळवायचे धंदे यांना करता येतात. कोणी साधे त्यावर आपले मत (निषेध) देखील मांडत नाही. सत्तेत असल्येल्यांना नाविलाजाने यावर बोलावं लागतं हे त्यांच्या बोलण्यावरूनच दिसून येतं. खर्डा गावातल्या नितीन आगेच्या हत्येनंतर तेथील पालक मंत्री मधुकर पिचड यांनी केलेलं दुर्लक्ष आणि आरामात त्यांचे कामं उरकून घेतलेली पीडितांची भेट. बीड, नगर, जालनासारख्या जिल्ह्यांमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व. आजसुद्धा नगरच्या काही गावांमध्ये मागासलेल्या गरिबांना अस्पृश्य मानून लांबून वरून पाणी दिलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला तेथील दलितांची परिस्थिती सांगून जातात.
अश्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. "दलित पँथर"सारख्या आक्रमक संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःवर घ्यायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला "समता सैनिक दल", गुजरातमध्ये अस्तित्वात असलेला "स्वयम सैनिक दल" अशा संघटनांनी ठोस भूमिका घेऊन या अत्याचारांच्या विरोधात उतरून लढा दिला पाहिजे. सुरुवातीपासून दलित म्हणून पुढे आलेल्या समाजाच्या वाटेलाच सर्वात जास्त संघर्ष आलेला आहे; हे ओळखून राजकीय क्षेत्रात गटातटाचे राजकारण बंद करून एकत्र येण्याची समाजाला खूप जास्त गरज आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज उभा करणे अशक्य आहे. अशा सर्व संघटना आणि राजकीय पक्षांनी वैयक्तिक वाद विसरून एकरूप झाल्यावर एकच सर्वात मोठा पक्ष तथा संघटना निर्माण होईल, ज्याने समाजातील अशा अमानवी घटनांना रोखण्यास मदत होईल.
अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच घडत असलेले प्रकार पाहून आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्या भागाला "कास्ट प्रोन" म्हणजेच जातीव्यवस्थेच्या भेदभावाने ग्रस्त घोषित करा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाच आठवड्यात जातीभेदाचे चार प्रकार समोर आले आहेत. नितीन आगे या तरुणाची अमानुष हत्या, एका दलित स्त्रीच्या मृतदेहाचा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास सवर्णांचा विरोध, एका बौध्द कुटुंबाच्या घराची नासधूस करून त्यांचं घरातील समान आणि तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्या घराबाहेर फेकून त्यांना बेघर करणे, गावाच्या जत्रेत शिवाजी महाराजांच्या गाण्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीत लावल्यामुळे सवर्णांनी जत्रेतील दलितांवर केलेली दगडफेक. गेल्याच महिन्यात आंबेडकर जयंतीमध्ये जातीयवाद्यांनी जयंती साजरी करणाऱ्या लोकांवर केलेली दगडफेक; साताऱ्यात एका मातंग जातीच्या स्त्रीची गावातून नग्न धिंड काढणे. काही वर्षांपूर्वी झालेली खैरलांजी. त्याही आधीची नामांतर चळवळ, रमाबाई नगर हत्याकांड, आणि संपूर्ण भारतातील अशा कित्येक घटना लक्षात घेतल्या तर आपल्याला हे कळेल की एकूण भारतीय समाजात जातीमुळे आलेला फुकटचा गर्व आणि त्यातून घडलेले समाजातील दुर्बल घटकांवारचे वाईट परिणाम हे मानवी हक्काचं उल्लंघन करणाऱ्या घटनांचे फार मोठे आणि भयानक चित्र उभे करणारे उदाहरण आहेत; आणि या सर्व प्रकरणात पोलिसांनी केलेला हलगर्जीपणा हा निषेधार्य आहे. समाजाची एकूण परिस्थिती ही दलितांच्या विरोधात दिसते. जिथे कुठे अॅट्रॉसिटीचे प्रकार घडतात, तिथे नेहमी रिपाई किंवा आंबेडकरी विचारांच्या लोकांनीच जाऊन भेट का द्यावी? इतर पक्ष/संघटना या भेट देण्याचे तर सोडा, पण त्यांना न्याय मिळवून देण्यातसुद्धा त्या संघटनांचा सहभाग नसतो; फक्त मत मिळवायचे धंदे यांना करता येतात. कोणी साधे त्यावर आपले मत (निषेध) देखील मांडत नाही. सत्तेत असल्येल्यांना नाविलाजाने यावर बोलावं लागतं हे त्यांच्या बोलण्यावरूनच दिसून येतं. खर्डा गावातल्या नितीन आगेच्या हत्येनंतर तेथील पालक मंत्री मधुकर पिचड यांनी केलेलं दुर्लक्ष आणि आरामात त्यांचे कामं उरकून घेतलेली पीडितांची भेट. बीड, नगर, जालनासारख्या जिल्ह्यांमध्ये असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचं वर्चस्व. आजसुद्धा नगरच्या काही गावांमध्ये मागासलेल्या गरिबांना अस्पृश्य मानून लांबून वरून पाणी दिलं जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला तेथील दलितांची परिस्थिती सांगून जातात.
अश्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. "दलित पँथर"सारख्या आक्रमक संघटना पुन्हा उभी करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःवर घ्यायला हवी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला "समता सैनिक दल", गुजरातमध्ये अस्तित्वात असलेला "स्वयम सैनिक दल" अशा संघटनांनी ठोस भूमिका घेऊन या अत्याचारांच्या विरोधात उतरून लढा दिला पाहिजे. सुरुवातीपासून दलित म्हणून पुढे आलेल्या समाजाच्या वाटेलाच सर्वात जास्त संघर्ष आलेला आहे; हे ओळखून राजकीय क्षेत्रात गटातटाचे राजकारण बंद करून एकत्र येण्याची समाजाला खूप जास्त गरज आहे. याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज उभा करणे अशक्य आहे. अशा सर्व संघटना आणि राजकीय पक्षांनी वैयक्तिक वाद विसरून एकरूप झाल्यावर एकच सर्वात मोठा पक्ष तथा संघटना निर्माण होईल, ज्याने समाजातील अशा अमानवी घटनांना रोखण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment