Skip to main content

"१" इतिहास मुक्तीचा

१ जानेवारी १८१८ चा इतिहास
कोणाला माहित आहे का?
मला माहित आहे,
विटाळ होत असेल या सत्याचा.
अस्पृश्यांचा इतिहास आहे हा;
जे लढले जुलमी पेशवाईच्या विरोधात.
युद्ध नावाला होतं इंग्रज आणि मराठ्यांचं,
खरं ते होतं हक्क, अस्मिता आणि
जातिभेदाच्या उच्चाटनासाठी.
अस्पृश्य आणि पेशव्यांचं युद्ध...
कोणी शिकवलंच नाही शाळेत हे सर्व.
शाळेत होता इतिहास हरलेल्या लोकांचा
कारण की ते स्पृश्य होते.
मग ते हरलेले का असेनात,
पानिपतात किंवा महाराष्ट्रात...

त्या दिवशी युद्ध सुरु होण्याआधी
शिरूरहून भीमा कोरेगावात
महार बटालियन ४३ किलोमीटर
उपाशी पोटी मार्च करत आले.
सकाळीच पेशव्याचे सैनिक हजर झाले;
वीस हजार घोड्यावर स्वार,
आठ हजार पायी तयार.
असं सैन्य त्या पेशव्यांचं,
जवळजवळ ३० हजार सैनिकांचं...
त्यातले दोन हजार आधीच पळून गेले होते.
महार बटालियन पाचशेच होते.
बारा तास युद्ध चाललं,
पाचशेच्या सैन्याने २८ हजारांना कापलं.
जुलमी पेशवाईला तोडलं,
आणि मनुवादी शक्तीला संपवलं.

हा इतिहास शाळेच्या पुस्तकात
एखाद्या पानावर छापला तर
मुलांना लक्षात तरी येईल
की पेशवाई तर संपली, पण ती कशी...
हे सांगताना त्यांना "त्या" सैन्यांचं नाव घ्यावं लागणार,
म्हणून हा इतिहास अभ्यासातून गाळला गेलाय.
पण आम्हाला कॉलेजात सांगितली जातेय महानता,
पळपुट्या बाजीराव पेशव्याची;
शिवाजी महाराजांच्या बाजूला बसवून...

जर खरंच विटाळ होतच असेल
अस्पृश्यांच्या इतिहासाचा,
तर मी तयार आहे
तुम्हाला बाटवायला...
अस्पृश्य होऊन सतत
तुम्हाला खऱ्या इतिहासाचा स्पर्श देत राहीन,
आणि तुम्हीसुद्धा असंच वाचत राहणार
लपून छापून आम्ही घडवलेल्या
साहित्याला..... इतिहासाला.....

जय भीम!
Salute to Mahar Battalion for saving us from casteist Peshwa rule.

- आशित साबळे

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.