Skip to main content

Posts

Showing posts with the label शिवाजी

जय महाराष्ट्र की, जय भीम !

 एक विचित्र अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी ज्या महान लोकांना मानतो, ज्यांचा आपण आदर केला पाहिजे, ज्यांनी ह्या समाजासाठी मोठं कार्य केलं, ज्यांनी जुन्या रुढी-परंपरा, अंधश्रद्धा, जाती-व्यवस्था, गुलामगिरी, अशा अनेक गोष्टींविरोधात लढले; अशा महान लोकांचा मी आदर ठेऊन, स्वतःला पुरोगामी विचारांचा मानतो. बुद्ध-शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो. इतिहासातील सर्व जाती-अंताच्या चळवळीच्या महापुरुषांना, विशेषतः गौतम बुद्ध व महात्मा फुले यांना गुरु मानून ज्यांनी आपल्याला स्वतंत्र भारताची राज्यघटना देऊन या भारतीय समाजात समता प्रस्थापित करण्याचं कार्य केलं, जे आयुष्यभर समाजातून जातींमुळे होणाऱ्या अत्याचाराविरोधात लढत राहिले, ज्यांनी खऱ्या अर्थाने भारताला स्वातंत्र्य प्राप्त करवून दिलं, दलित-शोषित-पिडीतांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्याचा व शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला, अशा महापुरुषाला अभिवादन करून, त्यांचं कार्य डोळ्यासमोर आणून मी व भारतातील करोडो लोक "जय भिम" बोलतो.  माझ्या एका जवळच्या मित्राने त्याचे विचार माझ्यासमोर मांडले आणि मला ध...

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी. ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी. अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली, विषमता भाव सहन केला, वंदितो चोखाच्या त्या चरणी... तूच अमुचा तारणहारा शिवबा, तूच अमुचा धनी, जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली. जिवाजीनं कापला शत्रूचा हात, बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी. तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी... या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा, राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा. उघडी केली शिक्षणाची दारं, दाखविली ज्ञानाची जोती, साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री. जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं, आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज. अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर, धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार. दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर, खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार, राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार, समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार. झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा, गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा, महारक्षकां...

"महामानव" : हे विशिष्ट जातीचे/धर्माचे नाही तर संपूर्ण समाजाचे असतात.

 आजच्या काळात आपल्या समाजामध्ये "जमातवादी राजकारण" खूप मोठ्या प्रमाणात चाललं आहे. अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या महामानवांचे नाव घेऊन व लोकांचा वापर करून आपला स्वार्थ साधत आहेत. अज्ञानी लोक त्यांच्या दिखाऊ भूमिकेच्या आहारी जाऊन बळी पडतात आणि आतलं "राजकारण" समजूनच घेत नाहीत. आजपर्यंत जेवढ्या पण (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष) राजकीय पक्षांमुळे दंगली झाल्या, त्यामध्ये वरच्या लोकांना काही फरक पडला नाही, तर त्यात बळी पडला तो सर्वसामान्य समाजच.    आज आपण पाहू शकतो की शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांचं नाव घेऊन किती चुकीचे काम चालतात.   शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू धर्म, हिंदुत्व, हिंदुत्ववाद वाढवणे आणि मुसलमानांचा द्वेष करणे अशा गोष्टी दिसतात. बोलतात शिवाजी महाराज हे "हिंदवी स्वराज्य" संस्थापक आहेत. महाराजांनी कधीच कोणाचाच जात-धर्म पाहिला नाही. ते फक्त स्वराज्यासाठी लढले. तो काळ पाहिला तर त्यावेळी लोक फक्त आपले राज्य वाढवण्यासाठी लढायचे, शिवाजी महाराजांनी आपल्या हक्काचे, रयतेचे राज्य जिंकले, हिंदू "धर्माचे" नाही. आताच्...