गेल्या निवडणुकांमध्ये भारतीयांनी मोदीला मत दिल्यामुळे आज त्यांची मनमानी आपल्याला दिसत आहे. भारतीय संविधानानुसार स्थापन केलेलं "नियोजन आयोग" (planning commission) मोदींनी त्याला सरळ बरखास्त केलं. जगातल्या इतर देशांमध्ये धर्मनिरपेक्ष भारताचा पंतप्रधान गेल्यावर तिकडच्या राष्ट्राध्यक्षांना "गीता" वाटत फिरतात. जगभरातून होणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या बातम्या टी.व्ही.वर येत नाही, तर उलट "संघाचे" भाषणं प्रसारित करण्यात येऊ लागले आहेत. ते अमेरिकेत भाषण करताना भारत देशाला उन्नत करणाऱ्या महामानवांना मोदी विसरतात. मोदींनी आजपर्यंत फक्त गुजरातच्या खोट्या प्रगतीच्या गप्पा केल्या, पण त्यांचंच सरकार असलेल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश यांच्यासारख्या इतर राज्यांचे काय झाले हे ते सांगत नाहीयेत. मुंबईचं महत्व कमी करण्यासाठी मोदी रिझव्र्ह बँक दिल्लीला हलवत आहेत, त्याची तयारी म्हणजे रिझव्र्ह बँके तीन कार्यालये मोदींनी आधीच दिल्लीला हलवले आहेत. त्या आधी पालघर येथे प्रस्तावित असलेले महाराष्ट्र राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे कार्यालयही मोदी यांनी गुजरातमध्ये हलवले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईचा सागरी किनारा सुरक्षित राहावा, यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र, मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका असतानाही त्यांनी ती गुजरातमध्ये का हलवली, याचं स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आणि मोदी हे पंतप्रधान असतानासुद्धा भाजपचा प्रचार करत आहेत आणि त्यात महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी सांगत आहेत.
संघाचे पूर्वीपासूनचे प्रचारक "दिनानाथ बात्रा" हे मोदींना भेटले आणि शिक्षणसंस्थेत पूर्ण बदल करण्याचे ठरले. ते म्हणाले सध्याच्या शिक्षणामुळे सर्व जण पाश्चात्य संस्कृतीत बुडालेले आहेत. त्यामुळे आता पाठ्यपुस्तक पुन्हा नव्याने लिहून त्यात सर्व पुस्तकांमध्ये पहिला धडा भारतीय इतिहास असेल आणि ज्यातून अध्यात्म, संस्कृत भाषा, देशभक्ती मुलांमध्ये रुजवली जाईल. भारताचा नकाशा सध्याच्या जगाप्रमाणे नसून तो लंका, भूतान, नेपाल, अफगाणिस्तान, इ. देशांना समाविष्ट करून पुरातन काळासारखा आणि त्यांच्या विचारसरणीनुसार "अखंड भारताचा" असेल. सर्व शाळा यांनी अशा पद्धतीने काम करावे कि मुलांना समाजकार्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी ते विविध खेडे आणि झोपडपट्ट्यांमध्ये स्वतः कार्यशाळा घेणार आहेत. (जेणेकरून विद्यार्थ्यांनाच थेट लहानपणापासूनच "प्रचारक" बनवता येईल.)
हे सर्व प्रयत्न भारताच्या संविधानाविरुद्ध आहेत आणि ते सर्वांसाठी घातक आहेत.
संघाचे पूर्वीपासूनचे प्रचारक "दिनानाथ बात्रा" हे मोदींना भेटले आणि शिक्षणसंस्थेत पूर्ण बदल करण्याचे ठरले. ते म्हणाले सध्याच्या शिक्षणामुळे सर्व जण पाश्चात्य संस्कृतीत बुडालेले आहेत. त्यामुळे आता पाठ्यपुस्तक पुन्हा नव्याने लिहून त्यात सर्व पुस्तकांमध्ये पहिला धडा भारतीय इतिहास असेल आणि ज्यातून अध्यात्म, संस्कृत भाषा, देशभक्ती मुलांमध्ये रुजवली जाईल. भारताचा नकाशा सध्याच्या जगाप्रमाणे नसून तो लंका, भूतान, नेपाल, अफगाणिस्तान, इ. देशांना समाविष्ट करून पुरातन काळासारखा आणि त्यांच्या विचारसरणीनुसार "अखंड भारताचा" असेल. सर्व शाळा यांनी अशा पद्धतीने काम करावे कि मुलांना समाजकार्याची आवड निर्माण होईल. त्यासाठी ते विविध खेडे आणि झोपडपट्ट्यांमध्ये स्वतः कार्यशाळा घेणार आहेत. (जेणेकरून विद्यार्थ्यांनाच थेट लहानपणापासूनच "प्रचारक" बनवता येईल.)
हे सर्व प्रयत्न भारताच्या संविधानाविरुद्ध आहेत आणि ते सर्वांसाठी घातक आहेत.
Comments
Post a Comment