आपल्या अंत रिक्षात एका सूर्याने अनेक ग्रहांना जन्म दिला. अनेक वर्ष त्या सर्व ग्रहांचा संघर्ष सुरूच होता, आजही सुरूच आहे... आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे जगण्यासाठी. त्या सुर्यानेच त्यांना जिवंत ठेवलं होतं. त्याच्याच भोवती सगळे ग्रह फिरत होते, आणि तोच सूर्य सगळ्या ग्रहांना प्रकाशमान करत होता; त्याच्या उजेडाने आणि तळपत्या तेजाने... त्याच तप्त ग्रहांमध्ये त्यांचं स्वतःचं जग निर्माण झालं. त्याच निसर्गाने त्यांना "निळं आभाळ" दाखवलं. ज्यावेळी अतितप्त सूर्यकिरणे त्या निळ्या आभाळातून - ग्रहांवर पडतात, आणि काही वेळाने सूर्य मावळतो; तेव्हा सर्वत्र "भगवं वातावरण" पसरतं... जे पुढे जगाला अंधाराकडे घेऊन जातं... आणि त्याच अंधारात ... पँथर जन्म घेतो त्या अंधाकाराला दूर करायला आणि पुन्हा या जगाला निळ्या आभाळाखाली प्रकाशमान करायला... - आशित साबळे.