Skip to main content

Posts

Showing posts from May, 2014

Impact of political advertising

 India has became too much aggressive in advertising & marketing. In 2014, Indian politics has adopted the funda of advertising looking at Indian psychology & changing trends and issues. According, to the elections till now, we can see the impact of advertising on Indian people. Many of them (voters) are from different background other than politics. These common people "get affected" to this aggressive marketing of a brand (candidate) through advertises.  This marketing contains not only advertises but also various types of campaigns targeting youth & colleges. This technique took the BJP to a higher success and fame. Also, social media helped it to reach more & more people. So, as a result, we can see, that people who do not belong to any political background or have no knowledge of politics or Indian history, they started supporting NaMo and all other candidates got erased from the minds of common people because of their slogan "Abki baar Modi Sarkar&

विक्षिप्त अनुभव

(मी जात आणि धर्म या दोन्ही गोष्टी सोडून दिलेला व्यक्ती आहे, हे लक्षात घेऊन पुढील अनुभव वाचा.)  दोन दिवसापूर्वी सकाळी माझ्या एका मित्राचा फोन आला. करिअरसाठी तो अनेकांना भेटतो, धडपड्या देतो. याच संदर्भात त्या मित्राला एक माणूस भेटला होता. त्याने मला आणि अजून एका मित्राला कॉल केला आणि म्हटला की "आपल्या करिअरची सुरुवात झालीच समज. ते सर खूप पैशावले आहेत आणि त्यांच्या खूप ओळखी आहेत. फक्त ठाण्याला येऊन त्या सरांची भेट घे." मी असं कोणाला भेटत नाही, पण त्या मित्राने खूप आग्रह करून मला बोलावून घेतलं.  मी ठाण्याला गेलो, पुढे अर्ध्या तासाच्य प्रवासानंतर पत्ता शोधून त्या सरांकडे पोहोचलो. दुसरा मित्र आधीच तिथे पोहोचला होता. त्या सरांचा फोटोग्राफीचा क्लास होता तो त्यांनी सांगितला, त्याची फीस कमीच होती पण माझ्यासाठी जरा जास्तच होती. पण तो माणूस ज्या गोष्टीसाठी आम्ही त्याला भेटायला गेलो ते क्षेत्र सोडून सतत वेगळ्या विषयात घुसत होता. माझी इच्छा होती की त्याने चित्रपट आणि त्याच्या टेक्निकल बाबींवर आमच्याशी चर्चा करावी; तशी मानसिकता बनवूनच मी गेलो होतो. पण तो माणूस सतत जात, धर्म , समाज आणि राजक
रोज व्होट्सअॅप वर अॅट्रॉसिटीच्या बातम्या येतायत, वर्तमानपत्र चाळल्यावर ते कोरे वाटतायत, आणि टी.व्ही वर मोदीच दिसतायत... टेक्नोलॉजीच्या नादात आपण समाज विसरलोय, चंगळवादाच्या जगात चॅटिंग करूनच थकलोय, gn.sd.tc करत आपण आपल्या जिवंतपणालाही मुकलोय... वेदना आणि संवेदना यांच्यातलं अंतर वाढत चाललंय, सनातन्यांच्या डोक्यात भेदभावाचं भूत दडलंय, आणि माणसाच्या जातीनेच त्याला मरेपर्यंत खाल्लंय... - आशित साबळे
    दलितांवर होणारे अत्त्याचार दिवसेंदिवस आणि तासंतास वाढतच जात आहेत. हे दलित केवळ धर्मांतर केलेले बौद्ध नसून हिंदू धर्मात आजही टिकून(?) असलेले खालच्या जातीतील लोक. दलित म्हटलं की, महार, मांग आणि काही अंशी चांभार अशा काही निवडक जाती सर्वसामान्य लोकांच्या मनात येतात. मुळात दलित म्हणजे कोणत्याही जाती, जमाती, वर्ण, वर्गातील पिढीत, शोषित, वंचित लोक. ज्यांच्यावर अत्त्याचार होत (आले) आहेत असा समाज म्हणजे दलित. पण भारतातील समाजव्यवस्थेने इथल्या सध्याच्या मानसिकतेनुसार दलितांनाच दलित बनवून ठेवलं आहे, त्यामुळे जे जाती निर्मुलनासाठी काम करतात त्यांनाच डोळ्यासमोर ठेऊन त्या "आंबेडकरी" सामाजाव्यातिरिक्त कोणताच समाज लोकांना दलित म्हणून दिसत नाही.     अहमदनगर जिल्ह्यात नुकतेच घडत असलेले प्रकार पाहून आणि आजूबाजूची परिस्थिती पाहून त्या भागाला "कास्ट प्रोन" म्हणजेच जातीव्यवस्थेच्या भेदभावाने ग्रस्त घोषित करा अशी चर्चा सुरु झाली आहे. एकाच आठवड्यात जातीभेदाचे चार प्रकार समोर आले आहेत. नितीन आगे या तरुणाची अमानुष हत्या, एका दलित स्त्रीच्या मृतदेहाचा हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्य