ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी.
ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.
अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,
विषमता भाव सहन केला,
वंदितो चोखाच्या त्या चरणी...
तूच अमुचा तारणहारा शिवबा,
तूच अमुचा धनी,
जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.
जिवाजीनं कापला शत्रूचा हात,
बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.
तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...
या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,
राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.
उघडी केली शिक्षणाची दारं,
दाखविली ज्ञानाची जोती,
साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.
जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,
आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.
अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,
धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.
दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,
खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,
राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,
समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.
झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,
गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,
महारक्षकांच्या महाराष्ट्राला लाभला वारसा शाहिरांचा,
रचले पोवाडे, रचली छक्कड आणि भारुड एकनाथांचा.
"माझी मैना" अण्णाभाऊ गायिले,
अत्मारामंचं आव्हान महाराष्ट्राने पहिले,
"खुशाल कोंबडं झाकून धरा" म्हणाले,
मराठी माणसाला जागविले.
"जय जय महाराष्ट्र माझा" साबळेनी गाजविले.
त्या अमर शेख आणि विलास घोगरेंना नमन माझे.
कलागुणांचा होतो महाराष्ट्रात उगम,
लोककलेचा कोहिनूर माझा विठ्ठल उमप.
शाहिरांचा वारसा बळावताहेत कृष्णकांत जाधव,
रसिकांच्या भक्तीने थकले नाही राजूबाबा शेख.
समृद्ध - संपन्न आहे महाराष्ट्र ही खाण,
या मातीत राहणे मजला, नाही कुठे जाणं...
- आशित साबळे.
ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.
अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,
विषमता भाव सहन केला,
वंदितो चोखाच्या त्या चरणी...
तूच अमुचा तारणहारा शिवबा,
तूच अमुचा धनी,
जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.
जिवाजीनं कापला शत्रूचा हात,
बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.
तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...
या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,
राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.
उघडी केली शिक्षणाची दारं,
दाखविली ज्ञानाची जोती,
साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.
जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,
आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.
अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,
धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.
दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,
खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,
राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,
समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.
झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,
गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,
महारक्षकांच्या महाराष्ट्राला लाभला वारसा शाहिरांचा,
रचले पोवाडे, रचली छक्कड आणि भारुड एकनाथांचा.
"माझी मैना" अण्णाभाऊ गायिले,
अत्मारामंचं आव्हान महाराष्ट्राने पहिले,
"खुशाल कोंबडं झाकून धरा" म्हणाले,
मराठी माणसाला जागविले.
"जय जय महाराष्ट्र माझा" साबळेनी गाजविले.
त्या अमर शेख आणि विलास घोगरेंना नमन माझे.
कलागुणांचा होतो महाराष्ट्रात उगम,
लोककलेचा कोहिनूर माझा विठ्ठल उमप.
शाहिरांचा वारसा बळावताहेत कृष्णकांत जाधव,
रसिकांच्या भक्तीने थकले नाही राजूबाबा शेख.
समृद्ध - संपन्न आहे महाराष्ट्र ही खाण,
या मातीत राहणे मजला, नाही कुठे जाणं...
- आशित साबळे.
Comments
Post a Comment