Skip to main content

वंदन महाराष्ट्राला

ही मराठी अमुची, बोली अमुची, संस्कृती मराठी.
ज्ञानात अमुच्या, तुकात अमुच्या, सोयरी मराठी.
अशी संपन्न संत परंपरा या महारष्ट्रा लाभली,
विषमता भाव सहन केला,
वंदितो चोखाच्या त्या चरणी...
तूच अमुचा तारणहारा शिवबा,
तूच अमुचा धनी,
जिजाऊ सारिख्या आईने तुजसारिखी महान व्यक्ती घडविली.
जिवाजीनं कापला शत्रूचा हात,
बाजीप्रभूनं हादरली पावनखिंडी.
तलवारी हाती घेण्याआधी तू शिवा फिरविल्या सोन्याच्या नांगरी...

या भूमीवर जन्मास एकच ते महात्मा,
राष्ट्रपिता संबोधितो मी, त्यांचं नाव आहे जोतीबा.
उघडी केली शिक्षणाची दारं,
दाखविली ज्ञानाची जोती,
साथ दिली क्रांतीसुर्याला आमची माय ती सावित्री.
जातीभेद मोडून शिकविली शूद्रांची पोरं,
आरक्षणाचे जनक आहेत शाहू महाराज.
अज्ञानी समाजाला दिले त्यांनी ज्ञान भरपूर,
धर्मांधांना केले सरळ, ते होते प्रबोधनकार.
दलितांची हाक ऐकून आले जन्मास आंबेडकर,
खूप शिकुनी मोठे झाले घटनेचे शिल्पकार,
राज्यघटनेत दिले त्यांनी आपणास मताधिकार,
समता, स्वतंत्रता, बंधुभाव करू आपण अंगीकार.

झाला सुरु लढा या संयुक्त महाराष्ट्राचा,
गेला बळी अमुच्या अनेक हुतात्म्यांचा,
महारक्षकांच्या महाराष्ट्राला लाभला वारसा शाहिरांचा,
रचले पोवाडे, रचली छक्कड आणि भारुड एकनाथांचा.
"माझी मैना" अण्णाभाऊ गायिले,
अत्मारामंचं आव्हान महाराष्ट्राने पहिले,
"खुशाल कोंबडं झाकून धरा" म्हणाले,
मराठी माणसाला जागविले.
"जय जय महाराष्ट्र माझा" साबळेनी गाजविले.
त्या अमर शेख आणि विलास घोगरेंना नमन माझे.

कलागुणांचा होतो महाराष्ट्रात उगम,
लोककलेचा कोहिनूर माझा विठ्ठल उमप.
शाहिरांचा वारसा बळावताहेत कृष्णकांत जाधव,
रसिकांच्या भक्तीने थकले नाही राजूबाबा शेख.

समृद्ध - संपन्न आहे महाराष्ट्र ही खाण,
या मातीत राहणे मजला, नाही कुठे जाणं...

- आशित साबळे.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, ...

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. ...

कसले हे बौद्ध...

 बौद्ध किंवा बुद्ध हा शब्द "बुद्धी"शी निगडीत आहे. जो व्यक्ती पंचशील पाळून अष्टांग मार्गाचा अवलंब करून बुद्धी प्राप्त करतो तो प्रबुद्ध, जो सर्वोच्च बुद्धी प्राप्त करून सम्यक विचार करतो तो सम्यक संबुद्ध आणि जो त्यांना अनुसरतो तो बौद्ध. आपल्या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जो बौद्ध धम्म अभिप्रेत होता तो याच अर्थाचा, पण आज भारतातील बौद्ध काय करतात? तर हिंदू देवांना विरोध, हिंदू धर्मातील जातींना विरोध, बुद्धाच्या मूर्तीची महापूजा, बुद्धाला नवस करणे... अरे काय हे...? ज्या बुद्धाने मूर्ती नाकारल्या त्याच्याच मूर्ती उभारल्या, ज्याने देव नाकारला त्याचाच देव केला. पण त्यांनी मानवाच्या जीवनासाठी काय संदेश दिला, काय तत्त्वज्ञान सांगितलं, काय विचार केला, ह्या गोष्टींची मात्र आपल्यात बोंब. हे असं असलं तर लोकांना काय हक्क स्वतःला बौद्ध म्हणायचा... फक्त बुद्ध किंवा बुद्धाची मूर्ती आवडत असल्याने कोणी बौद्ध होत नाही, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले तेव्हा त्यांनी लोकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या, त्या कशासाठी? त...