"दही हंडी" या सणात काय असं वैशिष्ट्य आहे की ज्यावर आज लाखो - करोडो रुपयांच्या स्पर्धा ठेवल्या जातात. ह्या सणाची सुरुवात हिंदू धर्मात मानल्या जाणाऱ्या भगवान श्री कृष्णापासून झाली. कृष्णाला लहानपणापासूनच दही - लोणी वगैरे खायला खूप आवडत होतं. घरी सारखं तो ते खाण्यासाठी हट्ट करायचा, बऱ्याचदा न सांगता ते खायचा आणि सांडवतही होता. म्हणून आई दही, ताक, लोणी यासारख्या गोष्टी त्याचापासून दूर ठेवायची जेणेकरून त्याचा हात तिथपर्यंत पोहचू नये. मग कृष्ण ते मिळवण्यासाठी पाय उंचावून, कशाकशावर उभा राहून प्रयत्न करायचा आणि ते मिळवायचा. तुम्ही यापुढची गोष्ट समजून घेण्यास सुज्ञ आहात हे समजून मी पुढे बोलतो...
अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्तमानपत्र वाचू शकतो की, किती जण जखमी होतात, आजीवन अधू होतात, एवढंच नाही तर मरणही पावतात. तरी दरवर्षी हेच सर्व तेवढ्याच संख्येने सुरु असतं.
जनकल्याणासाठी कार्य करू इच्छिणारे राजकीय पक्ष व नेते ह्याच जीवघेण्या सणात स्वतःच्या पक्षाची जाहिरात करत स्पर्धा आयोजित करतात. माझं वयक्तिक मत असं आहे की, याला बढावा देण्यासाठी जबाबदार आपला मिडिया आहे. ज्याप्रकारे ते अशा बातम्या दाखवतात, त्याने ह्या लोकांना अधिक प्रोत्साहन मिळतं.
याची दुसरी बाजू अशी की, हंडी फोडायला जाणारे पथक मोठ्या संख्येने एकत्र असल्यामुळे त्यांना माज येतो आणि अहंकाराने ते सर्वसामान्य लोकांना आवाज करून, चिडवून, त्रास देऊन मजा घेतात. एवढंच नाही तर मुलींनाही छेडतात. मग इथे प्रश्न येतो तो तुमच्या सणाचा, की तुम्ही तुमच्या 'देवाचा', 'सणाचा', देवाने निर्मिलेल्या 'जगातील मानवाचा' किती आदर करता? आणि असं जर होत असेल तर यातून सरळ-सरळ कळून येतं की, तुम्ही स्वार्थी हेतूने आपले सण साजरे करतात. बरोबरच आहे. ज्याच्यामुळे हा सण सुरु झाला, त्याचाकडूनच तुम्ही प्रेरणा घेणार ना, तो देव(?) तरी कुठे वेगळं काही करत होता.
अशी इथून ही सुरु झालेली दही हंडी आज कोणत्या "थराला" पोहोचली आहे ! ही सुरुवातच किती क्षुल्लक गोष्टीपासून झाली हे आपल्या लक्षात येते. आज हा सण साजरा करण्यासाठी लोकांनी मंडळ स्थापन करून तालिमी सुरु केल्या ! कशासाठी हे सगळं? जो खेळ क्षणात जीव घेऊ शकतो, हे माहित असतानासुद्धा पालक आपल्या मुलांना पाठवतात, याचं मला फार आश्चर्य वाटतं. बरं "कळतं पण वळत नाही" अशी गत असेल तर आपण वर्तमानपत्र वाचू शकतो की, किती जण जखमी होतात, आजीवन अधू होतात, एवढंच नाही तर मरणही पावतात. तरी दरवर्षी हेच सर्व तेवढ्याच संख्येने सुरु असतं.
जनकल्याणासाठी कार्य करू इच्छिणारे राजकीय पक्ष व नेते ह्याच जीवघेण्या सणात स्वतःच्या पक्षाची जाहिरात करत स्पर्धा आयोजित करतात. माझं वयक्तिक मत असं आहे की, याला बढावा देण्यासाठी जबाबदार आपला मिडिया आहे. ज्याप्रकारे ते अशा बातम्या दाखवतात, त्याने ह्या लोकांना अधिक प्रोत्साहन मिळतं.
याची दुसरी बाजू अशी की, हंडी फोडायला जाणारे पथक मोठ्या संख्येने एकत्र असल्यामुळे त्यांना माज येतो आणि अहंकाराने ते सर्वसामान्य लोकांना आवाज करून, चिडवून, त्रास देऊन मजा घेतात. एवढंच नाही तर मुलींनाही छेडतात. मग इथे प्रश्न येतो तो तुमच्या सणाचा, की तुम्ही तुमच्या 'देवाचा', 'सणाचा', देवाने निर्मिलेल्या 'जगातील मानवाचा' किती आदर करता? आणि असं जर होत असेल तर यातून सरळ-सरळ कळून येतं की, तुम्ही स्वार्थी हेतूने आपले सण साजरे करतात. बरोबरच आहे. ज्याच्यामुळे हा सण सुरु झाला, त्याचाकडूनच तुम्ही प्रेरणा घेणार ना, तो देव(?) तरी कुठे वेगळं काही करत होता.
Comments
Post a Comment