Skip to main content

स्त्री आणि पती

 पती कसा असावा? या विषयावर तर मी नक्कीच बोलणार नाहीये. कारण हा मुद्दा फार नंतर उदयास आला. हे का निर्माण झालं असावं? यावर मी "माझे विचार" मांडणार आहे...
इतिहासापेक्षा आपण आजचेच संदर्भ पाहू, तुमच्या लगेच लक्षात येईल, की पती ही संकल्पना निर्माण होताना नक्की काय झालं असावं.
 पती म्हणजे एखाद्या सजीव किंवा निर्जीव गोष्टीचा मालक. आज आपण लखपती म्हणतो तो असतो लाखो रुपयांचा मालक, करोडपती म्हणतो तो असतो करोडो रुपयांचा मालक, तसंच आपण फक्त "पती" म्हणतो तो असतो एखाद्या स्त्रीचा मालक. आता आपण जातो ते इतिहासातील स्त्रीदास्य, गुलामगिरी, अतिशूद्र ह्या गोष्टींकडे. बुद्ध काळापूर्वी स्त्रीसत्ता / मातृसत्ता होती, त्याच दरम्यान गणकाळ आला. त्याच्या काही काळानंतर आर्य भारतात आले. त्या आर्यांनी भारतातील लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी एक विशिष्ट वर्ग निर्माण केला, तो होता ब्राह्मण वर्ग. (इथे आजची ब्राह्मण जात समजू नये, तर ब्राह्मण या 'शब्दाचा अर्थ' मला अभिप्रेत आहे.) त्या ब्राह्मण वर्गाने इथल्या मूळच्या लोकांना मुर्ख बनवून त्यांच्यावर शासन करण्यासाठी वेद, पुरण, वेदांत, आरण्यके, उपनिषद, स्मृती, श्रुती इत्यादी प्रकारचे ग्रंथ निर्माण केले आणि त्याला धार्मिक अधिष्ठान दिलं. इतिहासापासून आजपर्यंत एक सत्य आहे, की एखाद्या समाजाला आपला गुलाम करायचा असेल तर त्यांच्या स्त्रियांना टार्गेट करा. कदाचित हेच तत्व वापरून मनुस्मृती लिहिली गेली, पण ती फक्त स्त्रियांपुरतीच नाही तर त्यामध्ये संपूर्ण समाजासाठी बंधनाचे कायदे लिहून ठेवले होते. त्याच विचारांवर आधारित अडीच-तीन हजार वर्ष ही गुलामगिरी चालली. मानुस्मृतीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण सांगितले. ती उतरंड होती, त्यात भेदभाव होता, प्रत्येक वर्ण एका खाली एक असा होता; पण त्याहीपेक्षा खाली होत्या स्त्रिया. कारण कोणताही वर्ण, कोणतीही जात असो, त्या त्या वर्णातील अथवा जातीतील स्त्रियांना दुय्यमच स्थान होतं. ही गोष्ट हजारो वर्ष लोकांना समजलीच नव्हती. बऱ्याच वर्षांनी एका महापुरुषाने ही संकल्पना मांडली, ते म्हणजे महात्मा जोतीबा फुले. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आणि चारही वर्णांच्या शेवटी अतिशूद्र ही नवीन संकल्पना मांडून लोकांना त्याची जाणीव करून दिली आणि  त्याविरुद्ध लढले.
 आता स्त्रिया का दुय्यम ठरल्या? शिकण्याचे, शिकवण्याचे व धर्माविषयी बोलायचे अधिकार ब्राह्मणांकडे असल्यामुळे, तेव्हाच्या काही कपटी ब्राह्मणांनी इतरांच्या नकळत ऋग्वेदात पुरुषसुक्त मिसळलं. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की हे देवानेच सांगितलेलं आहे आणि याला आपण अमान्य करूच शकत नाही; कारण आर्यांच्या टोळीने लोकांना भुरळ पडली होती की वेद - पुरण हे देवाने लिहिले. मग "धर्माने"(?) सांगितल्याप्रमाणे लोक वागू लागले. स्त्रियांनी सुद्धा स्वतःची हीच दुय्यम होऊन राहण्याची मानसिकता करून घेतली, ती आपण आज पर्यंत पाहतो.
 ती आज कशी पाहतो? स्त्रिया मंगळसूत्र, बांगड्या, कुंकू, जोडवे, पैंजण, इत्यादी स्वतःच्या शरीरावर चढवतात. त्या आज जरी स्त्रियांना सुशोभित, अलंकारित, सुंदर दिसण्यासाठी वापरल्या जात असल्या, तरी त्यामागे त्यांच्या गुलामीचा इतिहास आहे. पण ती मानसिकता आजच्या समाजातसुद्धा एवढी घट्ट रुजून आहे की, समजा आज मी एखाद्या वस्तीत जाऊन तेथील बायकांना म्हणालो, की मंगळसुत्र आणि हे सर्व तुमच्या गुलामीचं प्रतिक आहे, तर त्या मला जोड्याने मारायलाही कमी करणार नाहीत. नवऱ्याने बायकोवर चिडावे - रागवावे, तिला एखाद्या वेळी मारावे, या अशा गोष्टी स्वतः स्त्रीच अपेक्षा करून असतात. मग इतर कोणी जाऊन तिथे सुधारणा करूच शकत नाही.
 लग्न  ही संकल्पना जन्म घेताच स्त्री ही एकाच पुरुषाशी बांधील झाली. त्याअगोदर स्त्रियांचे अनेक पुरुषांशी नैसर्गिक संभोग होत होते. कारण लाज, इज्जत, भेदभाव या मानसिक गोष्टी तेव्हा अस्तित्वातच नव्हत्या म्हणूनच आदिमानवाला शरीरासाठी कपड्याची गरज भासली नाही. पण जेव्हा या गोष्टी अस्तित्वात येत गेल्या, तेव्हापासून मनुष्य प्रण्यातील दोन जाती लोक ओळखू लागले, ते म्हणजे स्त्री आणि पुरुष. मग त्यांच्यातले फरक त्यांना जाणवू लागले आणि लोक या गोष्टींबाबत विचार करू लागले. पुढे लग्न ही संकल्पना भौगोलिकदृष्ट्या भिन्न असायची. कुठे स्त्री पुरुषांना समान वागणूक तर कुठे त्यापैके कोणा एकालाच महत्व. त्याचदरम्यान पुरुषांनी स्वतःला उच्च ठरवलं आणि गुलामगिरीचे पुढील प्रतिक निर्माण झाले.
  काही ज्ञानी लोकांशी चर्चा करत असताना अशा गोष्टी माहित पडल्या की, गुलामीचे प्रतिक म्हणजे मंगळसुत्रातले दोन गोलाकार मणी ते पुरुष लिंगाचे प्रतिक आहे. बांगड्यांचा आवाज सतत जाणीव करून देतो की तू एका पुरुषाची स्त्री आहेस. जोड्व्यांची बनावट अशी असते ते गोल असून त्याला दोन्ही बाजूस टोक असतं जेणेकरून घरात वावरताना ते टोचले पाहिजे. नाकात व कानात दिसणारे दागिने पूर्वी पुरुष स्त्रियांना शिक्षा देण्यासाठी वापरत, जे सुरुवातीला टोचताना पण त्रास होतो आणि नंतर स्त्रीच्या शरीराला वेदना होण्यासाठी शिक्षा म्हणून ते ओढत होते. केस वाढविणे हाही त्याचाच प्रकार. या गोष्टी अनेक हजारो वर्ष चालत राहिल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत आपल्या संस्कृतीला पुरुषसत्ताक संस्कृती म्हणून लोक ओळखू लागले.
 स्त्रियांबाबत अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्याची मला फार चिंता वाटते...

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, ...

Constitution Day & We The People of India.

Just ask yourselves how many times have you wished your friends & family on the occasion of our country’s constitution day? We do celebrate the Independence day and Republic day, but we knowingly ignore the greatness & importance of Dr. Babasaheb Ambedkar. Why Dr. BR Ambedkar is important for all of us?   Just imagine our country before independence. We, all of us, were slaves of someone. There was a hierarchy of caste system. Each caste was inferior to some other caste. This system existed on the basis of Manusmriti. Even on top of this, there were the rulers of that time; be it French, Portuguese, Adilshahi, Nizamshahi, Britishers, etc. The situation of our country was pathetic before independence. It was only because of the Indian constitution which gave us equality, fraternity, justice, brotherhood, sisterhood, freedom of speech, freedom of choice, freedom of worship and various fundamental rights and duties too. This basic structure of democracy was given to us b...

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरस...