Skip to main content

रात्रीची रेल्वे आणि स्त्री

 काही दिवसांपासून रात्री उशिरा पर्यंत रेल्वे ने प्रवास करतोय. कांदिवली ते दादर भावासोबत ये जा आजकाल सुरूच आहे. काल रात्री १.३० च्या सुमारास दादरला घरी आलो. येताना प्रत्येक ट्रेनचं निरीक्षण करत असताना बरेच पुरुष स्त्रियांच्या डब्यात प्रवास करताना दिसले. रात्री काहीतरी १०-११ च्या नंतर स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना प्रवास करायची परवानगी देणे ही किती मुर्खासारखी गोष्ट आपल्या सरकारने केली आहे.

 एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार!  बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.

 पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्या गोष्टी हो. मुळात रात्रीच्या वेळी पुरुषांना गरजच काय एक्स्ट्रा डब्बा द्यायची. "ज्या वेळी गर्दीच नसते!" जर परिवार एकत्र जात असेल किंवा एखाद्या स्त्रीसोबत पुरुष असेल, तेव्हा तशी परवानगी ठीक आहे.

आता तुमच्या मनात आलं असेल की, मी असं का म्हणत आहे? तर साधी विचार करण्याची गोष्ट आहे की, रात्रीच्या वेळी सुशिक्षित लोक कमी आणि व्यर्थ फिरणारे, गुंड, चोर यांसारखे लोक जास्त असतात. तर ते अशी सुविधा असल्यास त्याचा फायदा करून घेणार नाही का... त्याने त्या डब्यातल्या स्त्रियांवर दडपण येत नसेल का...

 जास्तीत जास्त रेल्वेच्या केसेसमध्ये घटना रात्रीच का घडतात? दिवसा होत नाही, असं मी म्हणत नाही. पण जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे सुरक्षा असली पाहिजे. माणसे रात्री जनरल डब्यात अगदी सुखाने झोपून प्रवास करतात, आणि हे मी अनुभवलं आहे.

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, वंशाची

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरसमज झ

"वाचाल तर वाचाल"

 माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं  सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.  आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा.