काही दिवसांपासून रात्री उशिरा पर्यंत रेल्वे ने प्रवास करतोय. कांदिवली ते दादर भावासोबत ये जा आजकाल सुरूच आहे. काल रात्री १.३० च्या सुमारास दादरला घरी आलो. येताना प्रत्येक ट्रेनचं निरीक्षण करत असताना बरेच पुरुष स्त्रियांच्या डब्यात प्रवास करताना दिसले. रात्री काहीतरी १०-११ च्या नंतर स्त्रियांच्या डब्यात पुरुषांना प्रवास करायची परवानगी देणे ही किती मुर्खासारखी गोष्ट आपल्या सरकारने केली आहे.
एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार! बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.
पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्या गोष्टी हो. मुळात रात्रीच्या वेळी पुरुषांना गरजच काय एक्स्ट्रा डब्बा द्यायची. "ज्या वेळी गर्दीच नसते!" जर परिवार एकत्र जात असेल किंवा एखाद्या स्त्रीसोबत पुरुष असेल, तेव्हा तशी परवानगी ठीक आहे.
आता तुमच्या मनात आलं असेल की, मी असं का म्हणत आहे? तर साधी विचार करण्याची गोष्ट आहे की, रात्रीच्या वेळी सुशिक्षित लोक कमी आणि व्यर्थ फिरणारे, गुंड, चोर यांसारखे लोक जास्त असतात. तर ते अशी सुविधा असल्यास त्याचा फायदा करून घेणार नाही का... त्याने त्या डब्यातल्या स्त्रियांवर दडपण येत नसेल का...
जास्तीत जास्त रेल्वेच्या केसेसमध्ये घटना रात्रीच का घडतात? दिवसा होत नाही, असं मी म्हणत नाही. पण जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे सुरक्षा असली पाहिजे. माणसे रात्री जनरल डब्यात अगदी सुखाने झोपून प्रवास करतात, आणि हे मी अनुभवलं आहे.
एवढे सारे प्रकरण समोर येऊनसुद्धा आपल्या सरकारचे डोळे उघडत नाहीयेत. ज्या वेळी स्त्रियांना जास्त सुरक्षेची गरज असते, त्यावेळी नेमकं "पुरुषांना" डब्याच्या आत परवानगी ! अत्याचार होत असताना अनेक स्त्रिया त्याचा प्रतिकार करतील ही, पण अशा वेळी एक (एकटी) स्त्री काय करणार! बातम्या, वृत्तपत्र, टी.व्ही., इत्यादींद्वारे आपणास तुरळक गोष्टी कळतात, पण घडलेल्या असतात त्याहूनही कित्येक पट जास्त. ती गोष्ट वेगळी की स्त्रियांनी स्वतःलाच कुमकुवत बनवून ठेवलं आहे. पण काळाची गरज आहे ती त्यांना बळावण्याची.
पोलीस असतात, इतर चांगले लोक लक्ष ठेवतील, त्याने स्त्रियांचं संरक्षण होईल; ह्या सगळ्या नंतर च्या गोष्टी हो. मुळात रात्रीच्या वेळी पुरुषांना गरजच काय एक्स्ट्रा डब्बा द्यायची. "ज्या वेळी गर्दीच नसते!" जर परिवार एकत्र जात असेल किंवा एखाद्या स्त्रीसोबत पुरुष असेल, तेव्हा तशी परवानगी ठीक आहे.
आता तुमच्या मनात आलं असेल की, मी असं का म्हणत आहे? तर साधी विचार करण्याची गोष्ट आहे की, रात्रीच्या वेळी सुशिक्षित लोक कमी आणि व्यर्थ फिरणारे, गुंड, चोर यांसारखे लोक जास्त असतात. तर ते अशी सुविधा असल्यास त्याचा फायदा करून घेणार नाही का... त्याने त्या डब्यातल्या स्त्रियांवर दडपण येत नसेल का...
जास्तीत जास्त रेल्वेच्या केसेसमध्ये घटना रात्रीच का घडतात? दिवसा होत नाही, असं मी म्हणत नाही. पण जिथे जिथे शक्य आहे, तिथे तिथे सुरक्षा असली पाहिजे. माणसे रात्री जनरल डब्यात अगदी सुखाने झोपून प्रवास करतात, आणि हे मी अनुभवलं आहे.
Comments
Post a Comment