माणसाने व्यक्त व्हावं. ही (कमीतकमी) आजच्या काळाची गरज आहे. मी पूर्वी फार कमी बोलायचो. गेल्या वर्षी "मास मिडिया"ला प्रवेश घेतला. पोर्शन एवढं महत्वाचं आहे की ते मोठं असूनही शिकताना कंटाळा येत नाही. कॉलेजच्या अभ्यासासोबत बाहेरचं सामाजिक वाचन केलं आणि आता ही करत आहे. शिक्षकांकडून आणि वाचनामुळे जे काही ज्ञान मिळालं, ते सर्वांना सांगावसं वाटतंय. पूर्वीपेक्षा माझ्यामध्ये फार बदल घडला आहे. आता मी इतरांसमोर व्यक्त होतो, बोलतो, चर्चा करतो. हे सर्व सांगायचा हेतू हाच की, वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, "वाचाल तर वाचाल". हाच विचार मनात घेऊन वाचनाची सवय लावून घेतली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोक काय बोलतात, ते ऐकून घेण्याची मानसिकता व क्षमता विकसित केली.
आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. आपण काहीही वाचत असो, त्याला एक अभ्यासक, समीक्षक, चिकित्सक वा परीक्षक म्हणून पाहिलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्यासोबत त्या गोष्टींना समजून घेण्याची मानसिकता व क्षमता ठेवावी.
पत्रकारांना - का, कधी, काय, कुठे, कसं, केव्हा, कोण, ई. असे प्रश्न शिकवले जातात. खरं तर हे प्रश्न सर्वांना पडायला हवे. सूक्ष्म गोष्टींचा विचार करूनच त्या गोष्टींचा खरा अर्थ कळतो. एखाद्या विषयावर वाचन करत असताना, कोणा एका लेखकाच्या आधारावर न राहता, त्या गोष्टीचं दुसऱ्या बाजूचंसुद्धा वाचलं पाहिजे. म्हणजे एका नाण्याच्या दोन्ही बाजू आपणास कळतात. त्यातलं खरं काय नि खोटं काय? हे आपल्यालाच आपल्या बुद्धीने ठरवावं लागतं. आणि हे ठरवता आलं की आपण व्यक्त होतो, किंबहुना व्हायला शिकतो.
म्हणून मित्रांनो, सर्वांना हेच सांगायचं आहे की स्वतःच्या विकासासाठी ज्ञानार्जन हे फार महत्वाचं असतं. आपण शिकलो तर नक्कीच समाज सुधारू शकतो.
" आज मला हे जे काही लिहिता आलं ते "महात्मा जोतीबा फुले" यांचामुळे."
धन्यवाद!
आजच्या काळात लोक हौस, आवड किंवा मनोरंजन म्हणून काहीही वाचतात. काहींना तर काय वाचावं हेही कळत नाही. लायब्ररी मध्ये जाऊन लायब्ररीयनलाच सांगतात "द्या तुम्हाला वाटेल ते पुस्तक." सर्वप्रथम आपण काय वाचलं पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडायला हवा. आपण काहीही वाचत असो, त्याला एक अभ्यासक, समीक्षक, चिकित्सक वा परीक्षक म्हणून पाहिलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि त्यासोबत त्या गोष्टींना समजून घेण्याची मानसिकता व क्षमता ठेवावी.
पत्रकारांना - का, कधी, काय, कुठे, कसं, केव्हा, कोण, ई. असे प्रश्न शिकवले जातात. खरं तर हे प्रश्न सर्वांना पडायला हवे. सूक्ष्म गोष्टींचा विचार करूनच त्या गोष्टींचा खरा अर्थ कळतो. एखाद्या विषयावर वाचन करत असताना, कोणा एका लेखकाच्या आधारावर न राहता, त्या गोष्टीचं दुसऱ्या बाजूचंसुद्धा वाचलं पाहिजे. म्हणजे एका नाण्याच्या दोन्ही बाजू आपणास कळतात. त्यातलं खरं काय नि खोटं काय? हे आपल्यालाच आपल्या बुद्धीने ठरवावं लागतं. आणि हे ठरवता आलं की आपण व्यक्त होतो, किंबहुना व्हायला शिकतो.
म्हणून मित्रांनो, सर्वांना हेच सांगायचं आहे की स्वतःच्या विकासासाठी ज्ञानार्जन हे फार महत्वाचं असतं. आपण शिकलो तर नक्कीच समाज सुधारू शकतो.
" आज मला हे जे काही लिहिता आलं ते "महात्मा जोतीबा फुले" यांचामुळे."
धन्यवाद!
good one. keep it up- geetanjali rane
ReplyDeleteThank u Ma'm.
Delete