काय हिंदू धर्मीय खरंच गणेशोत्सव एक "धार्मिक" सण म्हणून साजरा करतात का?
बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रिक्षा जात असतानाच तो बॉम्ब फुटला आणि मग रिक्षाही फुटली. चालक व प्रवासी दोघे गंभीर जखमी झाले. पुढे त्यांचं काय झालं ते मला माहित नाही, पण ही गोष्ट काय साधारण नाही ना!
काही वर्षांपूर्वी तर गणपती बाप्पाच्य अति श्रद्धाळू भक्तांनी तर माणुसकीची हद्दच पर केली. सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या "लालबागचा राजा"च्या दर्शनाला लोकांची दरवर्षी प्रचंड गर्दी होते. त्याच गर्दीत एक म्हातारी होती. पण त्या ठिकाणी गेल्यावर लोकांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे आत जाऊन दर्शन घेणे; मग कोणाचं काहीही होवो. ती म्हातारी बाई रांगेत असताना, लवकर दर्शन घेण्यासाठी मागच्या लोकांनी तिला ढकलून बाजूला केलं आणि ती एका खांबाला जाऊन धडकली. तो खांब तिच्या छातीच्या मध्यभागी घुसत होता. गर्दीमुळे हलता ही येत नसल्याने काही मिनिटे तिला तसच वेदना सहन करत उभं राहावं लागलं. त्या दरम्यान तिच्या जवळ असणाऱ्या एकालाही तिला बाजूला करण्याचं सुचला नाही. माझा एक मित्र तिथे ड्यूटीवर होता, कसाबसा तो त्या म्हातारीपर्यंत पोहोचला आणि सर्वांना बाजूला ढकलून त्याने त्या बाईला बाजूला काढलं. वयोमानानुसार पाहिलं तर त्या म्हाताऱ्या बाईला किती त्रास झाला असेल. म्हणे चालले गणपतीच्या दर्शनाला...
रस्त्यावर सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी मंडळाने ऐपत आहे तेवढाच खर्च करणं अपेक्षित असतो, पण अधिक देखावा करण्यासाठी चक्क "स्पॉनसर्स"! तुम्हाला लोकांपर्यंत "देव" पोहोचवायचा आहे की डेकोरेशन? धर्माचं बाजारीकरण याला म्हणतात...
धर्म हवा आहे की देव?
मला असा प्रश्न पडतो की बाळगंगाधर टिळकांनी जेव्हा "सार्वजनिक गणेशोत्सव" सुरु केला तेव्हा त्यांनी भविष्यात होणाऱ्या विकृतीकरणाबद्दल विचार केला असेल की नसेल? कारण जेव्हा एखादा महापुरुष समाजासाठी काहीतरी करतो, तेव्हा तो त्या गोष्टीचा सर्व अंगाने विचार करतो. त्यांना आता या घडणाऱ्या गोष्टींबद्दल अंदाज कसा काय आला नाही? असो...
उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. पण गणपती हा प्रत्येक घरात आल्यामुळे कोणाला दुसऱ्यांच्या घरी जायची गरजच वाटत नाही, किंवा वाटली तरी घरातून स्वतःच्या गणपतीच्या सेवेमुळे वेळ मिळत नाही. मग अशा वेळी प्रश्न येतो तो "समाज एकत्र येण्यासाठी साजरा केला जाणारा धार्मिक सण" याच्या सुरुवातीचा. जेव्हा "परमेश्वर" ही संकल्पना उदयास येत होती, तेव्हा अर्धपशु व अर्धमानव असा देवाचा विचार केला जाऊ लागला; कारण मानव स्वतःसारखा परमेश्वर स्वीकारत नव्हता. काहीतरी मानवाहून वरचढ अशा या कारणाने देव ही संकल्पना सुरु झाली. मग ती देवाची प्रतिमा एका परिवारात स्थापन करून सर्व नेत्यागोत्यातले लोक त्याच्या घरी जमायचे. जसं मी या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हणालो की, उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. तसा हा पूर्वीसारखा दिसत नाही. किंबहुना अजून विभक्त होत चालला आहे...
धर्म आपल्याला आयुष्य जगण्याची पद्धत, विचार, मार्ग सांगतो जेणेकरून जीवन सुखमय व्हावे. रस्त्यावर प्रत्येक गणपती जाताना प्रत्येकाचे ढोल, बॅंडबाजे, आरत्या, ई सर्व वेगळेपणाने व अलिप्त. त्यामधून स्पर्धा सुरु होते, आणि मग त्यातून वैर होते. मग कशाला हवा आहे धर्म? फक्त देवालाच घेऊन बसा घरात...
जगण्यासाठी नैसर्गिक जग हवं आहे की प्रदुषित?
प्रत्येकाच्या घरात गणपती. प्रत्येक जण विसर्जन करणार. ते सर्व सामावून घेण्यासाठी समुद्र आहे एकच; आणि त्या समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात ते ढोल-नगारे, बॅंडबाजा, फटाके; तेही वाजतात एकाच रस्त्यावर प्रत्येकाचे. जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही एवढ्या वाक्यावरून विचार करू शकता. यातून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, अजून कित्येक प्रकारची हानी आपल्या निसर्गाला होत असते व पुढे ती नकळत आपल्यापर्यंतही पोहोचते.
सुधरा लोकांनो... धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. प्रत्येकाने गणपतीची प्रतिष्ठापन करण्याऐवजी एकत्रितपणे केली तर धार्मिक कार्यही पूर्ण झाल्यासारखे वाटेल आणि प्रदूषणसुद्धा कामी होईल...
- आशित साबळे.
बऱ्याच वर्षांपासून मी पाहतोय की गणेशोत्सव आला की लोक खुश होतात, पण त्यांचं खुश होण्याचं कारण नक्की काय याचं उत्तर आता दिसू लागलं आहे. मी समस्त हिंदू समाजाबद्दल बोलत नाहीये; पण काल घरी येताना बरेच मंडळी गणेश विसर्जनासाठी जाताना दिसले. गणपती मागे आणि पुढे "चिकनी चमेली" आणि "हलकट जवानी" सारख्या गाण्यांवर "बाप्पाचे भक्त" नाचत होते. त्या लोकांच्या गर्दीत काही जण कोल्डड्रिंकमध्ये दारू मिसळून बारी बारीने पित होते. विसर्जन करून आल्यावर सगळीच मुले रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच्या अंगावर त्यांच्या नकळत गुलाल उधळत होते. दारूच्या नशेत असणाऱ्या माणसांबद्दल तर सांगायलाच नको.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करताना टिळकांनी सांगितलं होतं का की, गणपतीच्या स्वागतासाठी आणि विसर्जनासाठी बॅंडबाजा, फटाके हे अपरिहार्य आहेत. काही वर्षांपूर्वी एका गावामध्ये जल्लोषात गणपतीला घेऊन चालले होते. त्यावेळी एकाने अगदी रस्त्याच्या मधोमध 'रस्सी बॉम्ब' लावला आणि गाड्यांना थांबवलंसुद्धा नाही. त्यावरून एक रिक्षा जात असतानाच तो बॉम्ब फुटला आणि मग रिक्षाही फुटली. चालक व प्रवासी दोघे गंभीर जखमी झाले. पुढे त्यांचं काय झालं ते मला माहित नाही, पण ही गोष्ट काय साधारण नाही ना!
काही वर्षांपूर्वी तर गणपती बाप्पाच्य अति श्रद्धाळू भक्तांनी तर माणुसकीची हद्दच पर केली. सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या "लालबागचा राजा"च्या दर्शनाला लोकांची दरवर्षी प्रचंड गर्दी होते. त्याच गर्दीत एक म्हातारी होती. पण त्या ठिकाणी गेल्यावर लोकांचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे आत जाऊन दर्शन घेणे; मग कोणाचं काहीही होवो. ती म्हातारी बाई रांगेत असताना, लवकर दर्शन घेण्यासाठी मागच्या लोकांनी तिला ढकलून बाजूला केलं आणि ती एका खांबाला जाऊन धडकली. तो खांब तिच्या छातीच्या मध्यभागी घुसत होता. गर्दीमुळे हलता ही येत नसल्याने काही मिनिटे तिला तसच वेदना सहन करत उभं राहावं लागलं. त्या दरम्यान तिच्या जवळ असणाऱ्या एकालाही तिला बाजूला करण्याचं सुचला नाही. माझा एक मित्र तिथे ड्यूटीवर होता, कसाबसा तो त्या म्हातारीपर्यंत पोहोचला आणि सर्वांना बाजूला ढकलून त्याने त्या बाईला बाजूला काढलं. वयोमानानुसार पाहिलं तर त्या म्हाताऱ्या बाईला किती त्रास झाला असेल. म्हणे चालले गणपतीच्या दर्शनाला...
रस्त्यावर सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी मंडळाने ऐपत आहे तेवढाच खर्च करणं अपेक्षित असतो, पण अधिक देखावा करण्यासाठी चक्क "स्पॉनसर्स"! तुम्हाला लोकांपर्यंत "देव" पोहोचवायचा आहे की डेकोरेशन? धर्माचं बाजारीकरण याला म्हणतात...
धर्म हवा आहे की देव?
मला असा प्रश्न पडतो की बाळगंगाधर टिळकांनी जेव्हा "सार्वजनिक गणेशोत्सव" सुरु केला तेव्हा त्यांनी भविष्यात होणाऱ्या विकृतीकरणाबद्दल विचार केला असेल की नसेल? कारण जेव्हा एखादा महापुरुष समाजासाठी काहीतरी करतो, तेव्हा तो त्या गोष्टीचा सर्व अंगाने विचार करतो. त्यांना आता या घडणाऱ्या गोष्टींबद्दल अंदाज कसा काय आला नाही? असो...
उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. पण गणपती हा प्रत्येक घरात आल्यामुळे कोणाला दुसऱ्यांच्या घरी जायची गरजच वाटत नाही, किंवा वाटली तरी घरातून स्वतःच्या गणपतीच्या सेवेमुळे वेळ मिळत नाही. मग अशा वेळी प्रश्न येतो तो "समाज एकत्र येण्यासाठी साजरा केला जाणारा धार्मिक सण" याच्या सुरुवातीचा. जेव्हा "परमेश्वर" ही संकल्पना उदयास येत होती, तेव्हा अर्धपशु व अर्धमानव असा देवाचा विचार केला जाऊ लागला; कारण मानव स्वतःसारखा परमेश्वर स्वीकारत नव्हता. काहीतरी मानवाहून वरचढ अशा या कारणाने देव ही संकल्पना सुरु झाली. मग ती देवाची प्रतिमा एका परिवारात स्थापन करून सर्व नेत्यागोत्यातले लोक त्याच्या घरी जमायचे. जसं मी या परिच्छेदाच्या सुरुवातीला म्हणालो की, उत्सव हा समाज एकत्र येण्यासाठी असतो. तसा हा पूर्वीसारखा दिसत नाही. किंबहुना अजून विभक्त होत चालला आहे...
धर्म आपल्याला आयुष्य जगण्याची पद्धत, विचार, मार्ग सांगतो जेणेकरून जीवन सुखमय व्हावे. रस्त्यावर प्रत्येक गणपती जाताना प्रत्येकाचे ढोल, बॅंडबाजे, आरत्या, ई सर्व वेगळेपणाने व अलिप्त. त्यामधून स्पर्धा सुरु होते, आणि मग त्यातून वैर होते. मग कशाला हवा आहे धर्म? फक्त देवालाच घेऊन बसा घरात...
जगण्यासाठी नैसर्गिक जग हवं आहे की प्रदुषित?
प्रत्येकाच्या घरात गणपती. प्रत्येक जण विसर्जन करणार. ते सर्व सामावून घेण्यासाठी समुद्र आहे एकच; आणि त्या समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागतात ते ढोल-नगारे, बॅंडबाजा, फटाके; तेही वाजतात एकाच रस्त्यावर प्रत्येकाचे. जास्त सांगायची गरज नाही, तुम्ही एवढ्या वाक्यावरून विचार करू शकता. यातून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, अजून कित्येक प्रकारची हानी आपल्या निसर्गाला होत असते व पुढे ती नकळत आपल्यापर्यंतही पोहोचते.
सुधरा लोकांनो... धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही. प्रत्येकाने गणपतीची प्रतिष्ठापन करण्याऐवजी एकत्रितपणे केली तर धार्मिक कार्यही पूर्ण झाल्यासारखे वाटेल आणि प्रदूषणसुद्धा कामी होईल...
- आशित साबळे.
Comments
Post a Comment