"साधू बाबा" या नावाचा व्यवसाय "२१व्या शतकात" जोरात चालला आहे. त्याचे दोन प्रकार दिसून येतात. ते म्हणजे मंत्र - जादूटोणा करणारे, आणि दुसरे उपदेश करणारे. आपल्या सर्वांना माहित आहे की जादूटोणा, करणी, वशीकरण, मुठ मारणे, ई. हे प्रकार किती वाईट आहेत. फक्त शब्दांच्या व मंत्रांच्या जोरावर इथे बसलेला माणूस दुरवर असलेल्या माणसाला कशी काय हानी पोहचवू शकतो! ही सर्वसाधारण गोष्ट आपल्याला कळते पण तरीही काही लोक त्या ढोंगी साधू बाबांकडे आपल्या समस्या घेऊन जातात, याच गोष्टीचा फायदा घेऊन ते लोक त्यांच्याकडे जाणार्यांकडून बक्कळ पैसे उकळतात. उगाचच आपण आपल्या वैयक्तिक गोष्टी त्यांना जाऊन सांगतो, त्या नाविलाजाचा फायदा ते पुरेपूर उचलतात. अशा वेळी आपल्याला त्या गोष्टीची भुरळ पडलेली असते. आपलं काम कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे, या भावनेने आपण समोरचा मागेल ते देऊन रिकामे होऊन जातो आणि ते ही मागचा पुढचा विचार न करता.
यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप्त, विचित्र असतात. त्यांना मानवाशी, समाजाशी, त्यांच्या भावनेशी काहीही देणं-घेणं नसतं. असं म्हणतात की या विद्येमध्ये वापरले जाणारे मंत्र इतके प्रभावी पण गुंतागुंतीचे असतात की ते उच्चारताना जर का चूक झाली किंवा थोडे वेगळे उच्चारले गेले, तर ते क्रिया करणाऱ्या व्यक्तीलाच धोकादायक ठरू शकतात, त्यांचा जीवही जाऊ शकतो. या प्रकारात मांत्रिक "काहीपण" (मानवी मल, माती, राख, मृत माणसाचे मास, ई.) खातात आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम झाला की म्हणतात मंत्र उलटले. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारे तेच लोक हा चुकीचा मार्ग स्वीकारून स्वतःचं जीवन धोक्यात घालतात.
घरची वाईट परिस्थिती, मुलीचं लग्न अशा गोष्टींवर तोडगा मिळवण्यासाठी स्वतःला व स्वतःच्या मुलीला ढोंगी बाबांकडे अर्पण करण्याऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एवढं होऊनसुद्धा लोक आपल्या सद्सतविवेक बुद्धीचा वापर का करत नाही याचं आश्चर्य आहे.
दुसरीकडे, संत बनू पाहणाऱ्या उपदेश देत फिरणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. काही जण उच्च शिक्षण घेऊन हे उद्योग करतात, तर नोकरी करून साईड-बिझनेस म्हणून. आपला भोळा-भाबडा समाज यांच्या मागे जातो आणि आपल्याला सर्वसाधारण गोष्टींचं उपजतच ज्ञान असतानाही इतरांकडून तेच ज्ञान पैसे खर्च करून ऐकण्यास भलं मानतो. अशा मानसिकतेचा ते लोक फायदा घेतात आणि आपलं दुकान चालवतात. आज त्या लोकांची अफाट संपत्ती आहे, तीही आपल्यामुळेच. शेवटी आपल्याला त्याचा निकाल काय मिळतो, ते अनुभव घेतलेल्या लोकांना विचारा, ज्यांनी ह्या गोष्टी करून सोडून दिल्या आहेत....
माझं सर्वांना हेच सांगणं आहे की अशा नकली लोकांवर विश्वास ठेऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, आणि या गोष्टी इतरांनाही सांगा.
यातला अगदी भयानक व भीषण प्रकार म्हणजे "अघोरी विद्या". यामध्ये पशुबळी, नरबळी यासारख्या विकृत गोष्टी चालतात. या विद्येला अभ्यासणारे मांत्रिक फारच विद्रूप, विक्षिप्त, विचित्र असतात. त्यांना मानवाशी, समाजाशी, त्यांच्या भावनेशी काहीही देणं-घेणं नसतं. असं म्हणतात की या विद्येमध्ये वापरले जाणारे मंत्र इतके प्रभावी पण गुंतागुंतीचे असतात की ते उच्चारताना जर का चूक झाली किंवा थोडे वेगळे उच्चारले गेले, तर ते क्रिया करणाऱ्या व्यक्तीलाच धोकादायक ठरू शकतात, त्यांचा जीवही जाऊ शकतो. या प्रकारात मांत्रिक "काहीपण" (मानवी मल, माती, राख, मृत माणसाचे मास, ई.) खातात आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम झाला की म्हणतात मंत्र उलटले. या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणारे तेच लोक हा चुकीचा मार्ग स्वीकारून स्वतःचं जीवन धोक्यात घालतात.
घरची वाईट परिस्थिती, मुलीचं लग्न अशा गोष्टींवर तोडगा मिळवण्यासाठी स्वतःला व स्वतःच्या मुलीला ढोंगी बाबांकडे अर्पण करण्याऱ्या घटना उघडकीस आल्या आहेत. एवढं होऊनसुद्धा लोक आपल्या सद्सतविवेक बुद्धीचा वापर का करत नाही याचं आश्चर्य आहे.
दुसरीकडे, संत बनू पाहणाऱ्या उपदेश देत फिरणाऱ्या लोकांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. काही जण उच्च शिक्षण घेऊन हे उद्योग करतात, तर नोकरी करून साईड-बिझनेस म्हणून. आपला भोळा-भाबडा समाज यांच्या मागे जातो आणि आपल्याला सर्वसाधारण गोष्टींचं उपजतच ज्ञान असतानाही इतरांकडून तेच ज्ञान पैसे खर्च करून ऐकण्यास भलं मानतो. अशा मानसिकतेचा ते लोक फायदा घेतात आणि आपलं दुकान चालवतात. आज त्या लोकांची अफाट संपत्ती आहे, तीही आपल्यामुळेच. शेवटी आपल्याला त्याचा निकाल काय मिळतो, ते अनुभव घेतलेल्या लोकांना विचारा, ज्यांनी ह्या गोष्टी करून सोडून दिल्या आहेत....
माझं सर्वांना हेच सांगणं आहे की अशा नकली लोकांवर विश्वास ठेऊ नका, अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, आणि या गोष्टी इतरांनाही सांगा.
Comments
Post a Comment