Skip to main content

कुठे हरवली आहे संवेदनशीलता...


 “माणूस मारतो म्हणजे नेमकं काय होतं? तर लोक म्हणतात तो चेतनाहीन होतो. पण अविरत चेतना वागवत हिंडणारे, फिरणारे, खाणारे, पिणारे सारेच लोक खरंच जिवंत असतात...? खरं सांगायचं तर असं नसतं. वरवर जिवंत दिसणारे आपण खरंतर मेलेलो असतो. फक्त आपला अंत्यसंस्कार झालेला नसतो. पहिला मारतो विचार, मग मारते विचारधारा आणि त्यानंतर मारते संवेदना आणि मग अस्तित्वात येतं एक संवेदनाहीन जग. जे खरंतर एक स्मशानभूमीच असतं. या स्माशाणात आपल्याला कोणीही, कुठेही, कसंही ढकलत नेत असतं.” लोकशाहीर संभाजी भागात यांचे हे वाक्य मला आवर्जून सांगावेसे वाटतात.
 आपल्या देशात सध्या स्मशानभूमीसारखी परिस्थिती झाली आहे; म्हणजेच लोक संवेदनाहीन झाले आहेत. रोजच्या जगण्यात आणि रोजच्या वर्तमानपत्रात आपण अशा अनेक गोष्टी बघतो. असे अनेक उदाहरण सतत आपल्या समोर येत असतात. म्हणजे कुठे अतिरेकी किंवा बॉम्ब हल्ला झाला की जखमी लोकांना पाहून आपण म्हणतो की “बरं झालं हे आपल्या इथे नाही झालं ते...”; किंवा कोणी रस्त्यात एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर आपण दुर्लक्ष करून बाजूने निघून जातो; किंवा कुठे अपघात झाला तर लोक मदत करण्याऐवजी अपघातग्रस्तांचे फोटो काढत असतात. गेल्या महिन्यात दादरमध्ये एका दुकानाला आग लागली होती. तिथे बचावकार्यासाठी आलेल्या लोकांपेक्षा जास्त लोक फोटो काढणारे होते. काल रस्त्यात एका कुत्र्याला गाडीने धडक मारली. तो कुत्रा वेदनेने फार ओरडत, किंचाळत भुंकत होता. जमा झालेल्या लोकांमध्ये एक मुलगी पुढे जाऊन बघू लागली तर तिच्या सोबतचा मुलगा बोलला “काही नाही गं. जाऊदे, कुत्रा आहे तो.” या सर्व बारीकसारीक गोष्टींवरून कळतं की आपल्याला दुसर्‍यांच्या जीवाची किंमत कळत नाही. दुसऱ्यांच्या वेदना आपल्याला जाणवतसुद्धा नाहीत.
 एका शाळेत एक मुलगा दुसर्‍या मुलाला त्याच्या जातीवरून चिडवत होता. त्या दोघांचं खूप भांडण झालं आणि ते शिक्षिकेला समजलं. ती शिक्षिका म्हणाली, “आपण काय ब्राम्हण किंवा मराठा आहोत का... आपली जात कोणती - वैश्य वाणी, तर आपण आपलं काम करायचं...” या वाक्याचा असा अर्थ होतो की जातीभेद करण्यासाठी ब्राम्हण आणि मराठा जातीचे लोक आहेत, आपण त्यांच्या मध्ये नाही पडायचं. ती शिक्षिका त्या मुलाला अशी समजावून सांगू शकत होती की “जातीभेद करू नये. आपण सर्व माणसंच आहोत. जात-धर्म या गोष्टी रोजच्या जगण्यात नाही आणायच्या...” पण इथल्या समाजव्यवस्थेने ग्रासलेल्या लोकांकडून फार कमी चांगल्या गोष्टी घडतात. कारण त्यांना घरातूनच जातीपाती शिकवल्या जातात. माझा एक मित्र म्हणाला की त्याच्या घरी त्याचे आईवडील असं शिकवत होते की “महार, मातंग, चांभार या जातीच्या लोकांच्या घरी जायचं नाही. गेलास तरी काही खायचं प्यायचं नाही.” आता यावरून माणसांच्या जाणीवा प्रगल्भ होण्याऐवजी संकुचित होत चालल्या आहेत असंच दिसून येतं.
 १४ फेब्रुवारीला लोकांनी Valentine’s Day साजरा करू नये म्हणून काही सनातनी हिंदुत्ववादी संघटना उदा. शिवसेना, बजरंग दल, रणवीर सेना, अशा अनेक संघटनांनी या प्रेमाच्या दिवसाला विरोध करून हिंसा पसरवली. बाहेर दिसणाऱ्या जोडप्यांना धमकावण्यापासून ते मारहाणीपर्यंत सर्व हिंसा वापरली. कारण काय तर हिंदू संस्कृती बिघडते. ज्यांचे असे विचार आहेत, त्यांच्या काय जाणीवा, काय विचार, आणि काय संवेदनशीलता असेल हे कळून येते. प्रेम, दया, करुणा, विज्ञानवाद नष्ट करून क्रौर्य, हिंसा, मत्सर, भेद आणि अंधश्रद्धा पसरवणारे लोक काय संस्कृती जपतील हे एका संवेदनशील मनालाच कळेल. जिथे माणसं मारले जातात तिथे दुसरी तालिबान आणि अल-कायदा बनायला काय वेळ लागणार...
 अखंड भारतात मुस्लीमद्वेष पसरवणारे संघासारख्या संघटना प्रबळ होत आहेत आणि फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार, भगतसिंग यांच्या देशात धर्मांधता वाढते आहे आणि ती सत्ता भोगत आहे यापेक्षा देशाला घातक गोष्ट काय... संत तुकोबा, संत चोखामेळा यांच्यापासून बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल असोत वा गांधीजी अथवा डॉ. नरेंद्र दाभोलकर असोत; किंवा काल-परवा झालेला कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला असो. ही आक्रमणाची परंपरा अजून सुरूच आहे. देशाला बाहेरून आतंकवाद आणि आतून नक्षलवादाने पिडले आहे. देशातल्या माणसांना बाहेरून धर्मवाद आणि आतून जातीवादाने पिडले आहे. माणसातील मानसिकता बाहेरून वेदनाहीन आणि आतून संवेदनाहीन झाली आहे. देशातला युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला सुभाषचंद्र बोस म्हणत आहे; आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कोण होते असे प्रश्न विचारत आहे. भांडवलवाद, त्याला संपवायला जन्माला आलेला साम्यवाद, पुरोगामित्व, क्रांती, शोषण, पिळवणूक, हे शब्दसुद्धा आजच्या कोलेजच्या तरुणांना माहीत नाहीत. आता प्रश्न इथपर्यंत पोहचला आहे की, “निषेध म्हणजे काय?”

- आशित

Comments

Popular posts from this blog

Court movie song lyrics

अरे दादा, दादा रे... भले दादा... (Chorus + lead) अरे रान रान रान, चला उठवू सारे रान रे... (Chorus ⬇️) जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. कठीण आला काळ, मातीशी तुटे नाळ, युगाचा अंध खेळ, डोळेच केले गहाळ. सावात दिसे चोर, घुबडात दिसे मोर, लहानात दिसे थोर, थोरात दिसे पोर. अरारारारा. अरे भले भले भुलले, भलतेच गाती गान रे... (Chorus) दुस्मान (हे हे), दुस्मान (हे हे), दुस्मान सर्वनाश, तरी गुणगान रे... जाण जाण जाण  जहरी दुष्मनाला जाण रे हे हे हे हे हे हे हे. सैतान काळा गोरा, चिमटीत जीव कोरा, रंगाचा करी मारा, मरणाचा चढे पारा, रंगाचा खेळ खेळी, कोरतो भेद भाळी, मानव हे उभे जाळी, जाळ्यात माय होळी. अरारारारा हा! हे रंग रंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे, आहा! (Chorus) भंग भंग रे... (Chorus ⬇️) रंगून भंगले, भंगुन दंगले, दंगुन गुंगले, गुंगून दंगले. ही निबीड जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले, आहा! (Chorus) जंग जंगले... (Chorus ⬇️) धर्माची जंगले, जातीची जंगले, ...

Constitution Day & We The People of India.

Just ask yourselves how many times have you wished your friends & family on the occasion of our country’s constitution day? We do celebrate the Independence day and Republic day, but we knowingly ignore the greatness & importance of Dr. Babasaheb Ambedkar. Why Dr. BR Ambedkar is important for all of us?   Just imagine our country before independence. We, all of us, were slaves of someone. There was a hierarchy of caste system. Each caste was inferior to some other caste. This system existed on the basis of Manusmriti. Even on top of this, there were the rulers of that time; be it French, Portuguese, Adilshahi, Nizamshahi, Britishers, etc. The situation of our country was pathetic before independence. It was only because of the Indian constitution which gave us equality, fraternity, justice, brotherhood, sisterhood, freedom of speech, freedom of choice, freedom of worship and various fundamental rights and duties too. This basic structure of democracy was given to us b...

दलित म्हणजे कोण?

 दलित म्हणजे ती व्यक्ती किंवा तो समाज ज्याचं शोषण होत असतं, ज्यावर अत्याचार होत असतो. मुळात दलित म्हणजे शोषित व पिडीत समाज किंवा व्यक्ती, मग तो कोणत्याही स्तरातील जातीचा अथवा वर्णाचा असो. पूर्वीपासून आपल्या समाजात वर्णव्यवस्था आणि जातींची उतरंड असल्यामुळे सवर्णांकडून फक्त खालच्या स्तरातील जातींच्या लोकांवर अत्याचार झाले. त्याच लोकांना आपण दलित म्हणतो. ही संकल्पना तेव्हाच लोकांच्या मनात रुजली की खालच्या स्तरातील जाती म्हणजे दलित. याच कारणामुळे आज आपण विशिष्ट समाजाला दलित म्हणून संबोधतो. दलित या शब्दाचा अर्थ आपण जर जात किंवा विशिष्ट जातीचा समाज म्हणून घेत असू तर हा एक प्रकारचा गैरसमज आहे. दलित म्हणजे जात किंवा कोणता विशिष्ट समाज घटक नसून ती माणसाची परिस्थिती आहे. समाजात माणसा - माणसात हा जातींचा भेदभाव पाहून महात्मा फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून दिली आणि विद्रोह केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या शोषित व पिडीत लोकांसाठी समाजातील विषमतेविरुद्ध लढले. आज त्याच कारणामुळे ते लोक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, काही भक्तसुद्धा आहेत; म्हणून आजच्या काळात लोकांना असा गैरस...