ही माहिती मी फेसबुकवरून "निर्वाण बोधी" यांचाकडून मिळवली आहे. यातला एकही शब्द माझा नाही. फक्त आंबेडकरांच्या पत्रकारितेबद्दल माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा हा माझा प्रयत्न :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण...
अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑॅगस्ट 1920)
राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक - अंक दुसरा 14 फेबुवारी 1920)
डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकाऱ्यांकडून करून घेतले. मात्र "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थतीत बहिष्कृत भारताचे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.'' थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
"मूकनायक'च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला.
पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. उच्च कोटीचे तत्त्वज्ञान, प्रकांड पांडित्य, गाढा अभ्यास, समुद्राचा ठाव घेणारी विेषण क्षमता याचबरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या पत्रांमधून होते. तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ही वृत्तपत्रे चालविली नाहीत, तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून व्यक्त होत होता.
उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना त्यांनी "मूकनायक'ची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून बातम्या, लेख व इतर माहिती ते स्वत: पाठवीत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत मात्र ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आणि काही इतर कारणांमुळे मूकनायक बंद पडले. त्याचे त्यांना अतीव दु:ख झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता म्हणजे एक समाजशास्त्रीय विश्लेषण...
अन्याय सहन न होणे, हेच मनुष्याच्या मनाचे उन्नत स्वरूप होय. (मूकनायक - अंक 14 वा 14 ऑॅगस्ट 1920)
राजकारणाचे सर्वसाधारण असे दोन हेतू आहेत. एक शासन व दुसरा संस्कृती. (मूकनायक - अंक दुसरा 14 फेबुवारी 1920)
डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), जनता (1930) आणि प्रबुद्ध भारत (1956) या नावांनी पाक्षिके चालविली. यापैकी जनता आणि प्रबुद्ध भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन बाबासाहेबांनी स्वत: न करता सहकाऱ्यांकडून करून घेतले. मात्र "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांना स्वत:लाच करावे लागले. बहिष्कृत भारताच्या संपादनात बाबासाहेब स्वत: ओळ न ओळीकडे लक्ष देत असत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ""बहिष्कृत भारताच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती तसेच बिनमोली संपादकी काम करण्यास स्वार्थ्यत्यागी असा दलितातील माणूसही लाभला नाही. बहिष्कृत भारताच्या संपादकाच्या प्रौढ लिखाणास दबून गेल्याने म्हणा किंवा सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे म्हणा, बाहेरच्या लोकांचा त्यास मिळावा तितका पाठिंबा मिळाला नाही. अशा स्थतीत बहिष्कृत भारताचे 24-24 रकाने लिहून काढण्याची सारी जबाबदारी एकट्या संपादकास घ्यावी लागली.'' थोडक्यात, बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी "मूकनायक' आणि "बहिष्कृत भारत' ही पत्रे त्यासाठी आधारभूत आहेत. या पत्रांमधून डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
"मूकनायक'च्या सुरवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते. मूकनायकाने त्याकाळी सर्वार्थाने मुक्या असलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश दिसून येतात. पहिला म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि दुसरा म्हणजे समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता मात्र यापेक्षा वेगळी म्हणजेच संपूर्ण मानवमुक्तीचा धगधगता अंगार होती. वरपांगी समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते याच देशात माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी, यासाठी तोंडातून शब्दसुद्धा काढायला तयार नव्हते. अशा परिस्थितीत दुसऱ्या बाजूला माणसाला माणूसकीचे निसर्गदत्त हक्क मिळवून देण्याचा, त्याला त्याच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांच्या पत्रातून केला जात होता. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायकच्या रूपाने नवा आवाज मिळाला.
पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी अत्युच्च दर्जाची पात्रता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते. उच्च कोटीचे तत्त्वज्ञान, प्रकांड पांडित्य, गाढा अभ्यास, समुद्राचा ठाव घेणारी विेषण क्षमता याचबरोबर भाषिक सौंदर्याचे उत्तुंग दर्शन त्यांच्या पत्रांमधून होते. तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीची मुखपत्रे म्हणून ही वृत्तपत्रे चालविली नाहीत, तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावादेखील त्यातून व्यक्त होत होता.
उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना त्यांनी "मूकनायक'ची जबाबदारी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून बातम्या, लेख व इतर माहिती ते स्वत: पाठवीत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत मात्र ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आणि काही इतर कारणांमुळे मूकनायक बंद पडले. त्याचे त्यांना अतीव दु:ख झाले.
Comments
Post a Comment